Dharmendra Pradhan Resigns : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ! संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
सातत्याने होत असलेल्या विरोधानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resigns) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Dharmendra Pradhan Resigns : NEET (नीट) परीक्षा पेपर लीक प्रकरणी देशभरात उठलेल्या संतापाच्या लाटेनंतर अखेर एक मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे. या प्रकरणावरून सातत्याने होत असलेल्या विरोधानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resigns) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resigns) यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली जात होती. या आंदोलनाला अखेर यश आले असून, महिनाभरापासून सुरू असलेल्या या लढ्याचा हा मोठा विजय मानला जात आहे.
धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resigns) यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते.
या आंदोल दरम्यान कार्यकर्त्यांनी थेट संसद भवनावर मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, या मोर्चादरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेली आणि पोलिसांनी आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या पोलीस कारवाईत अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले, ज्यामुळे वातावरण आणखीनच तापले.
या घटनेनंतर दिपके यांनी इशारा दिला होता की, जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर येत्या २६ तारखेला यापेक्षाही मोठा मोर्चा काढला जाईल. आंदोलकांचा हा आक्रमक पवित्रा आणि वाढता दबाव पाहून धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी या आंदोलनाचे आणि देशातील तरुणांचे कौतुक करत सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
ते म्हणाले की, या आंदोलनाला चिरडून टाकण्याच्या धमक्या सरकारकडून दिल्या जात होत्या, तसेच आंदोलनाला परदेशातून निधी येत असल्याच्या अफवाही पेरल्या गेल्या. परंतु, सर्व विरोधाला झुगारून तब्बल १२ वर्षांनंतर देशात असे एक आंदोलन उभे राहिले, ज्याने एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशात लोकशाही जवळपास मृतप्राय झाली होती, परंतु या घटनेने लोकशाहीला पुन्हा एकदा नवे जीवदान दिले आहे. हे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित नव्हते, तर पुणे, मुंबईसह संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यांनी यासाठी रस्ता रोखला होता.
सरकारला उशिरा का होईना जाग आली, पण त्यासाठी देशातील अनेक तरुण-तरुणींना आपले रक्त सांडावे लागले आणि हाडे मोडून घ्यावी लागली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resigns) यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षण मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, असा दावाही राऊत यांनी आपल्या निवेदनात केला.






