CM Mamata Banerjee | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभ हा मृत्युकुंभ बनला असल्याची टीका मंगळवारी राज्य विधानसभेत केली. “महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे. महाकुंभाच्या आयोजनासाठी योग्य नियोजन करण्यात आले नाही. तसेच, व्हीआयपी लोकांना विशेष सुविधा देण्यात आल्या,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांच्या या विधानानंतर भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बंगालच्या विधानसभेच्या विरोधी पक्षाचे नेते सुवेंदू अधिकरी यांनी, “ममता बॅनर्जी यांना 144 वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभाबाबत काही कल्पना नाही. त्या हिंदू धर्माच्या चालीरीतींचा आदर करीत नाही आणि सनातानी लोकांचा विश्वास, आस्थाही समजू शकत नाही. महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलेल्या करोडो हिंदूंच्या भावना त्यांना समजणार नाहीत.” पुढे ते म्हणाले, “ममता बॅनर्जींना हिंदू धर्माबद्दल फारसे ज्ञान नाही. महाकुंभला मृत्यु कुंभ सांगून त्यांनी कोटी भक्तांचा अपमान केला आहे. त्यांना हे देखील माहित असले पाहिजे की कोट्यावधी भक्त केवळ बंगालहून महाकुंनभ येथे गेले आहेत आणि अजूनही मोठ्या संख्येने जात आहेत. सत्य जगासमोर आहे. त्यांचे खोटे सत्याच्या समोर टिकणार नाही.” CM Mamata Banerjee | लालू प्रसाद यादव यांचे वादग्रस्त विधान अलिकडेच, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याला फालतू म्हटले होते. लालू प्रसाद यादव यांना माध्यमांनी महाकुंभमेळ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कुंभला काही अर्थ नाही आहे. फालतू आहे कुंभ, अशी टीका लाल प्रसाद यादव यांनी केली. CM Mamata Banerjee | ममता बॅनर्जी काय म्हणाल्या? ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत यूपी सरकारवर टीका केली होती. ज्यात त्या म्हणाल्या होत्या की, ‘हा मृत्यू कुंभ आहे. मी महाकुंभचा आदर करते आणि मी पवित्र गंगा मातेचा सन्मान करते, परंतु येथे कोणतीही योजना नाही. किती लोक वाचले आहेत? श्रीमंत आणि व्हीआयपींसाठी एक लाख रुपयांपर्यंत तंबू बसविण्याची व्यवस्था आहे, परंतु कुंभात गरिबांसाठी कोणतीही व्यवस्था नाही. मेळ्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती होणे सामान्य आहे, पण हे होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. हे रोखण्यासाठी तुम्ही काय योजना आखल्या?”, असा सवालही त्यांनी केला. दोन वेळा घडली चेंगराचेंगरीची घटना महाकुंभमेळ्यादरम्यान आतापर्यंत दोन वेळा चेंगराचेंगरी झाली आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाले होते. यानंतर, १५ फेब्रुवारीच्या रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. हेही वाचा: आजपासून रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार, भारताचे सामने कधी? एका क्लिकवर पाहा संपूर्ण वेळापत्रक