Sunetra Pawar Post : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जात होते. आज अजितदादा आपल्यात नाहीत हे कटू सत्य सर्वांना स्विकारावे लागत आहे. अजितदादांचा रुबाब महाराष्ट्र राज्याला माहित होता. त्यांच्या कामाची शिस्त प्रशासनासह राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यानांच होती. पण नियतीने अजित दादांसारख्या कर्तृत्ववान नेत्याला हिरावून घेतले. २८ जानेवारीला त्यांचे भीषण विमान अपघातात दुर्देवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र पोरका झाला असल्याची भावना आहे. अजितदादांसोबत काम करणारे त्यांच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या उणिव पदोपदी भासत आहे. अजितदादांसोबत नेत्यांच्या आठवणी आहेत. याच आठवणींना शोकसभेतून उजाळा देण्यात आला. मुंबईतली वरळी येथील डोम सभागृहात अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एका विशेष शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला अनेक व्यक्तींनी हजेरी लावत अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांना अश्रू अनावर झाले, तर काहींचा कंठ दाटला. आता या शोकसभेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवरून एक ट्वीट केले आहे. या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. बारामतीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाचा ध्यास घेऊन दिवस-रात्र झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, ही जाणीव उपस्थितांच्या प्रत्येक शब्दातून प्रकर्षाने जाणवत होती. विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिकांनी दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना डोळे पाणावले, हीच त्यांच्या आयुष्यभर कमावलेल्या अपार प्रेमाची जिवंत साक्ष आहे, असे ट्वीटमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दांत व्यक्त केल्या. सभागृहात दादांच्या कार्याची, त्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाची आणि राज्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची आठवण… pic.twitter.com/g4mRN7bFSW — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 23, 2026 नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दांत व्यक्त केल्या. सभागृहात दादांच्या कार्याची, त्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाची आणि राज्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची आठवण प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती. दादांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यांचा विलक्षण संगम होता. बारामतीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाचा ध्यास घेऊन दिवस-रात्र झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, ही जाणीव उपस्थितांच्या प्रत्येक शब्दातून प्रकर्षाने जाणवत होती. विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिकांनी दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना डोळे पाणावले, हीच त्यांच्या आयुष्यभर कमावलेल्या अपार प्रेमाची जिवंत साक्ष आहे. दादांनी रुजवलेली कामाची शिस्त, दूरदृष्टीतून आखलेला विकासाचा मार्ग आणि लोकहितासाठीची अखंड तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे. त्यांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी नव्या जोमाने कार्यरत राहणे, हीच त्यांना वाहिलेली सर्वोच्च श्रद्धांजली ठरेल. हेही वाचा : Dada Bhuse : ७० व्या वर्षी हातात पाटी-पेन्सिल? सातारा जिल्ह्याच्या ‘या’ उपक्रमाचे शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक