Union Budget 2025 | अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी शनिवारी 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. राहुल गांधी यांनी बुलेटच्या जखमेवर बँड-एड म्हणून अर्थसंकल्पाचे वर्णन केले. यावर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “काँग्रेसने या अर्थसंकल्पावर टीका करू नये. मध्यमवर्गीयांना किती लाभ झाला आहे हे त्यांनी बघितले पाहिजे. ६० वर्षांच्या राजवटीत काँग्रेसला ५ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नही करमुक्त करता आले नाही आणि केंद्र सरकारने थेट १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले.” पुढे ते म्हणाले, “अर्थमंत्र्यांनी केवळ मध्यमवर्गीयांनाच दिलासा दिला नाही, तर अनेक तंत्रज्ञानही करमुक्त केले आहे. तसेच अनेक कर्करोगाच्या औषधांवरील करही कमी केला आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य राजकीय आहे. त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचे काहीही ज्ञान नाही,” असा टोला सरमा यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. राहुल गांधी काय म्हणाले होते? कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाबाबत बुलेटमुळे झालेल्या जखमांवर बँड-एड ठेवण्यासारखे आहे असे म्हंटले. तसेच ‘जागतिक अनिश्चिततेदरम्यान, आपले आर्थिक संकट सोडविण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता, परंतु सुधारित कल्पनांच्या बाबतीत हे सरकार दिवाळखोर झाले आहे,’ असेही त्यांनी म्हंटले. Union Budget 2025 | हेही वाचा: किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे? कधीपासून सुरू झाली? जाणून घ्या कार्डचे नेमके फायदे…