मुंबई – आजच्या काळात मर्यादीत षटकांचेच क्रिकेट खेळण्याकडे खेळाडूंचा कल वाढला आहे. मात्र, रेड बॉल क्रिकेटलाही तेवढेच मनहत्व देणे गरजेचे आहे. जे खेळाडू देशांतर्गत रेडबॉल क्रिकेट खेळणार नाहीत त्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा गर्भीत इशारा बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी दिला आहे.
अलिकडेच अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्या चिंतेचे कारण ठरत आहेत. काही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. हा असा बदल आहे जो अपेक्षित नव्हता. देशांतर्गत क्रिकेट हा नेहमीच भारतीय क्रिकेटचा पाया राहिला आहे. देशांतर्गत क्रिकेट हा भारतीय क्रिकेटचा कणा आहे आणि भारतीय संघातील रिक्त स्थाने भरली जातील असे काम करतो. भारतीय क्रिकेटबद्दलची आमची दृष्टी पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. भारतासाठी खेळू इच्छिणाऱ्या प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी हा निवडीसाठी महत्त्वाचा निकष आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग न घेतल्याने गंभीर परिणाम होतील, असेही शहा म्हणाले.
तंदुरुस्त राहण्यासाठी आणि पुढील आयपीएल हंगामाची तयारी करण्यासाठी काही खेळाडूंनी सध्याच्या रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याकडे दुर्लक्ष केले. राजस्थानचा वेगवान गोलंदाज दीपक चहर, झारखंडचा यष्टिरक्षक इशान किशन आणि मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर या खेळाडूंचा समावेश आहे, जे रणजी करंडक सामन्यांच्या अंतिम फेरीतही भाग घेताना दिसले नाहीत.
Ranji Trophy 2024 : उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ 8 संघांमध्ये होणार चुरशीची स्पर्धा…
जानेवारीपूर्वीच हे खेळाडू आयपीएलच्या तयारीत दिसले. त्यामुळे बीसीसीआय संतप्त झाली आहे. येत्या काही दिवसांत देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्यांच्या राज्य संघाकडून खेळण्यासाठी आदेश दिला जाणार आङे. जे खेळाडू दुखापत ग्रस्त आहेत त्यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवले जाइल व त्यांना देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यासाठी सुट दिली जाईल, असेही शहा म्हणाले.
Virat Kohli : विराट-अनुष्का पुन्हा बनले आई-बाबा, वामिकाला भाऊ की बहिण? नावंही आलं समोर
पुनरागमनासाठी हे महत्वाचे – द्रविड
इशान किशनच्या पुनरागमनावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटले आहे की, इशानच नव्हे तर जे खेळाडू सध्या राष्ट्रीय संघातून विविध कारणांसाठी बाहेर आहेत. त्यांना जर त्यांना संघात परतायचे असेल तर त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. इशानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले होते. तेव्हापासून तो निवडीसाठी उपलब्ध नाही. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटही खेळलेले नाही मग या स्थितीत त्याची राष्ट्रीय संघात कशी व कोणत्या निकषाद्वारे निवड करायची, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे.