मुंबई – राज्यातील अनेक भागांत दडी मारलेला पाऊस पुन्हा बरसणार आहे. येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारपासून म्हणजे 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येत्या एक-दोन दिवसांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुण्यातही मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईतही 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सून पावसाचे पुनरागमन झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 1,400 कोटी रुपये किमतीचे 700 किलोग्रॅमपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त
दरम्यान, देशातील कर्नाटक, केरळसह राजधानी दिल्लीत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर या परिसारत पाऊस झाला आहे. येत्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
80 हजार महिलांना व्हायचे आहे “अग्निवीर”; नौदलात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी