Rohit Pawar :..तर सर्वांनाच अधिक आनंद झाला असता! सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar : सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar’s reaction after Sonam Wangchuk ended his fast : देशभरात सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची चर्चा आहे. गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा मागणीसाठी कॅाकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटत असून आंदोलनाची व्याप्ती आता देशभरातील राज्यांमध्ये वाढताना दिसत आहे.
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूीमीवर इतर राज्यांमध्यील तरुण देखील रस्त्यावर उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काल मध्यरात्री एक मोठी घडामोड घडली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. काही वेळी चर्चा झाल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडलं. त्यांच्या तीन मागण्या सरकारने मान्य करण्याचे आश्वासन त्यांना नड्डा यांनी दिल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडलं. (Rohit Pawar)
…तर सर्वांनाच अधिक आनंद झाला असता (Rohit Pawar)
गेल्या २६ दिवांपासून नीट पेपरफुटी प्रकरणी सोनम वांगचुक उपोषण करत होते. त्यांनी उपोषण सोडल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ,”ज्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी हे उपोषण केलं त्यांचा राजीनामा न होताच आंदोलक विद्यार्थ्यांच्या हस्ते उपोषण सोडलं असतं तर सर्वांनाच अधिक आनंद झाला असता.” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याशिवाय संपूर्ण देशात एक चांगला संदेशही गेला असता, असेही ते म्हणाले. रोहित पवार यांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपलं मतं व्यक्त केलं.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल २६ दिवसांनी उपोषण सोडलं याचा सर्वांनाच आनंद आहे. कारण या वयात २६ दिवस उपोषण करणं ही नक्कीच कठीण गोष्ट आहे, पण ज्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी हे उपोषण केलं त्यांचा राजीनामा न होताच आंदोलक विद्यार्थ्यांच्या हस्ते उपोषण सोडलं असतं तर…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 24, 2026
नेमकं काय म्हणाले रोहित पवार ? (Rohit Pawar)
“सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल २६ दिवसांनी उपोषण सोडलं याचा सर्वांनाच आनंद आहे. कारण या वयात २६ दिवस उपोषण करणं ही नक्कीच कठीण गोष्ट आहे, पण ज्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी हे उपोषण केलं त्यांचा राजीनामा न होताच आंदोलक विद्यार्थ्यांच्या हस्ते उपोषण सोडलं असतं तर सर्वांनाच अधिक आनंद झाला असता आणि संपूर्ण देशात एक चांगला संदेशही गेला असता.”
असो! देशासाठी सोनम वांगचूक यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी उपोषण सुटण्याचीच गरज होती. ते सुटलं, आता नंबर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा… तो झाल्याशिवाय माघार नसल्याची घोषणा विद्यार्थ्यांनी केलीच आहे. त्यांच्या या घोषणेशी आम्ही सर्वजण पूर्ण सहमत आहोत. त्यासाठीच आज मीही दिल्लीत पोचतोय… जंतरमंतरवर…! असेही ते म्हणाले आहेत.





