Sanjay Raut : सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; केला गंभीर आरोप म्हणाले “…आता थांबणार नाही”
Sanjay Raut : उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

Sanjay Raut : नीट पेपरफुटीप्रकरणासह केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाची झळ आता सर्वत्र उमटली आहे. गेल्या महिन्याभरापासून कॅाकरोच जनता पार्टीचे आंदोलन राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू आहे. या आंदोलनातील प्रमुख मागणी ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. देशभरातील विविध राज्यांमधून विद्यार्थ्यी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. (Sanjay Raut)
एकीकडे या आंदोलनाद्वारे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली असताना दिल्लीत मध्यरात्री मोठी घडामोड घडली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. त्यांनी सरकारडे केलेल्या तीन अटी मान्य केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर आता यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
…..तर देशाला अधिक समाधान वाटले असते. (Sanjay Raut)
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सोनम वांगचुक यांनी सर्व आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत जंतर-मंतरवर उपोषण सोडले असते, तर देशाला अधिक समाधान वाटले असते. सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा शेवट आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हायला हवा होता.” असं मतं संजय राऊत यांनी व्यक्त केलं. अभिजीत दीपके किंवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासारखे प्रतिनिधी तेथे उपस्थित असायला हवे होते, असेही राऊत म्हणाले.
जनआंदोलन उभे राहिले असून ते आता थांबणार नाही (Sanjay Raut)
आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी सरकारने उपोषण संपवून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनातून देशातील शिक्षण व्यवस्थेतील बदलासाठी मोठे जनआंदोलन उभे राहिले असून ते आता थांबणार नाही, असा मोठा दावाही संजय राऊतांनी केला.
‘ठाकरे बंधूं’चा मुंबईत विराट मोर्चा (Sanjay Raut)
काल ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी मोठी घोषणा केली. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २६ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखील मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात इतर राजकीय पक्षांना देखील सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगान आंदोलन देखील होणार आहे.





