Maharashtra Weather Update : फेब्रुवारी संपल्यानंतर मार्चच्या सुरुवातीपासूनच राज्यातील वातावरणात उष्णतेचा बदल जाणवू लागला आहे. रात्रीही उकाडा जाणवत असून, यंदाचा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या (IMD) निरीक्षणानुसार, पूर्वेकडून कोकणाकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबई महानगर प्रदेशासह लगतच्या परिसरात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. उष्णतेची लाट विदर्भातील अकोला जिल्ह्यात नोंदवली गेली आहे. सोमवार, ९ मार्च रोजी येथे कमाल तापमान ४०.९ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. हवामान विभागानुसार, कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असून सरासरीच्या तुलनेत ४.५ अंश किंवा त्याहून अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट घोषित केली जाते. राज्यातील प्रमुख ठिकाणी तापमान (९ मार्च) मुंबई: ३९.० °C अकोला: ४०.९ °C सोलापूर: ३९.४ °C सांगली: ३८.२ °C पुणे: ३७.७ °C कोल्हापूर: ३७.१ °C उष्णतेच्या लाटेची शक्यता असलेले जिल्हे पालघर ठाणे मुंबई रायगड अमरावती वर्धा नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? घराबाहेर पडताना गॉगल्स, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारच्या वेळी (साधारण १२ ते ४ वाजेपर्यंत) घराबाहेर पडणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे (दररोज किमान ३-४ लिटर). हलके, सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घालावेत. ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, नारळपाणी यांसारखे पेय नियमित घ्यावेत. लक्षणे जाणवल्यास (थकवा, चक्कर, उलट्या, जास्त घाम येणे) तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. हेही वाचा : Shikrapur Accident : पुणे-नगर महामार्ग बनतोय ‘डेथ ट्रॅप’; शिक्रापूर हद्दीत दोन भीषण अपघातात दोघांचा मृत्यू