‘मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर’ – संजय राऊत
Updated On:

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाविषयीचा निर्णय घेईल, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीला सत्ता मिळाल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा राज्य सरकारचे नेतृत्व करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
त्यावर राऊत यांनी संबंधित उत्तर दिले. प्रथम निवडणूक होऊद्या. ती जिंकल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत राज्यातील सत्तारूढ महायुतीला बॅकफुटवर नेले. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. त्यातील तब्बल ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.





