मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली.
या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर मनसेकडून एक ट्विट केलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीमधील एका भागाचा व्हिडीओ मनसेने ट्विट केला आहे. मुंबई पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मांडल होतं. तोच व्हिडीओ आता पुन्हा ट्विट करण्यात आला आहे.
राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या… #बेधडक #राजदंड pic.twitter.com/CPyn43HkRn
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 9, 2024
त्यांच्या भाषणातील काही मिनिटांचा व्हिडीओ MNS अधिकृत त्यांच्या अकाऊंटवर ट्विट केला आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी महाराष्ट्र पोलिसांना मोकळीक द्या… महाराष्ट्रातून गुन्हेगारी नाहीशी होईल ! असे त्या व्हिडीओच्या शेवटी लिहीण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकणी आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले की,’मुख्यमंत्री या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत आहेत. राज्यात ज्यांच्याकडे शस्त्रं आहेत त्यांची आता चौकशी होणार आहे. ही शस्त्रं परवान्यासह बाळगली आहेत की, परवान्याशिवाय, याचा तपास केला जाईल, चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत.’