शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेना आक्रमक; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात आज ‘हंबरडा’ मोर्चा’

Uddhav Thackeray | महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे.मात्र राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे.
याकरिता ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ‘हंबरडा’ मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा कढण्यात येणार आहे. शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसंच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या या मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी एक वेळा आरशात बघावे – फडणवीस
“आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 16 लाख शेतकऱ्यांचे पैसे दिले, तर ठाकरे सरकारने अडीच वर्षांत कवडीही दिली नाही. मुख्यमंत्री असताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करूनही अडीच वर्षांत त्यांच्या खात्यात एक पैसाही जमा केला नाही. तेव्हा हंबरडा मोर्चा काढण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक वेळा आरशात बघावे. त्यानंतर ते असे मोर्चे काढणार नाहीत,” असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. Uddhav Thackeray |
काय आहे मागण्या?
दरम्यान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, पीकविम्यासाठी बदलण्यात आलेले निकष पूर्ववत ठेवावेत, जनावरे, घरांच्या नुकसानीची संपूर्ण मदत द्यावी. सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून हा मोर्चा निघणार असून, गुलमंडीवर त्याचा समारोप होणार आहे. या मोर्चाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे उपस्थित राहतील. Uddhav Thackeray |
हेही वाचा:




