Tilak Varma Backup : वर्ल्डकप २०२७ साठी गंभीरचा ‘मास्टर प्लॅन’! श्रेयसचा पर्याय म्हणून ‘या’ युवा खेळाडूला मिळणार थेट मोठी जबाबदारी
Tilak Varma Backup : या महाकुंभासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने आतापासूनच 'बॅकअप प्लॅन'वर वेगाने काम सुरू केले आहे.

Team India Grooming Tilak Varma As Shreyas Iyer Backup For ICC World Cup 2027 : दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे पुढील वर्षी रंगणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२७ (ICC World Cup 2027) स्पर्धेसाठी अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. या महाकुंभासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने आतापासूनच ‘बॅकअप प्लॅन’वर वेगाने काम सुरू केले आहे. भारतीय संघासाठी सध्या मधली फळी ही चिंतेची बाब ठरत असून, पहिल्या ६ फलंदाजांमध्ये श्रेयस अय्यरचा भक्कम पर्याय (Backup) म्हणून युवा फलंदाज तिलक वर्माला (Tilak Varma) तयार करण्याचा विचार निवड समिती आणि संघ व्यवस्थापन करत आहे.
डाव्या हाताचा फलंदाज अन् उपयुक्त फिरकी; तिलक वर्मा ठरणार हुकमी एक्का!
तिलक वर्मा हा डावखुरा फलंदाज असल्याने भारतीय संघाच्या सध्याच्या फलंदाजी फळीत योग्य ते संतुलन (Balance) निर्माण करू शकतो. केवळ फलंदाजीच नाही, तर मधल्या षटकांत संघाला गोलंदाजीचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून संघ व्यवस्थापन तिलकच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीलाही विशेष पैलू पाडत आहे. त्यामुळे डाव्या हाताची उपयुक्त फलंदाजी आणि पार्ट-टाईम गोलंदाजी अशा दुहेरी क्षमतेमुळे तिलककडे व्यवस्थापनाचे प्राधान्य आहे.
हार्दिक-नितीशच्या फिटनेसची चिंता; गंभीर-गिलची नवी रणनीती –
🚨 TILAK IN 2027 WORLD CUP PLANS. 🚨
– Tilak Varma seen as the backup of Shreyas Iyer in ODIs and could be picked for 2027 World Cup. (TOI). pic.twitter.com/gTm1iG6FIC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 30, 2026
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल यांना मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये मधल्या फळीत एका विश्वासू ऑलराउंडर पर्यायाची नितांत गरज भासत आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या सातत्यपूर्ण फिटनेसच्या अडचणी लक्षात घेता, पहिल्या ६ क्रमांकांवर फलंदाजीसोबतच किमान ४ ते ५ षटके गोलंदाजी करू शकेल अशा पर्यायाचा शोध सुरू आहे. या समीकरणात तिलक वर्मा सर्वात चपखल बसत आहे.
विश्वचषकापूर्वी मधली फळी मजबूत करण्यावर बीसीसीआयचा भर –
गेल्या काही वर्षांत महत्त्वाच्या स्पर्धांमधील मोक्याच्या क्षणी भारताची मधली फळी गडगडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे २०२७ च्या विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरवर संपूर्ण भार न टाकता तिलक वर्मासारख्या गुणवान खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरेशी संधी देऊन परिपक्व बनवण्याचा टीम इंडियाचा मानस आहे.





