Maharashtra Politics : महायुतीत पुन्हा राडा! तानाजी सावंत-राहुल मोटे समर्थक आमनेसामने; धाराशिवमध्ये दगडफेक, 45 जणांवर गुन्हे
Maharashtra Politics : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर महायुतीतील घटक पक्षांमधील अंतर्गत वाद आणि धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Maharashtra Politics : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवरील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. धाराशिव जिल्ह्यात शिवसेना नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल मोटे यांच्या समर्थकांमध्ये सोमवारी मध्यरात्री तुफान संघर्ष झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. (Maharashtra Politics)
धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार दगडफेक झाली. या हिंसक प्रकारात इनोव्हा, फॉर्च्युनर आणि थारसह सुमारे 10 ते 12 वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर सावंत गटाच्या समर्थकांनी हल्ला केला. दुसरीकडे, सावंत गटाने हे आरोप फेटाळून लावत विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा राग काढण्यासाठी आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला आहे. (Maharashtra Politics)
तसेच राहुल मोटे यांच्या सांगण्यावरून हा वाद उकरून काढण्यात आल्याचा आरोपही शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे. याउलट, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वाहनांची तोडफोड करून शिवसेनेवर खोटे आरोप केल्याचा दावा सावंत गटाने केला आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करत 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Maharashtra Politics)
Tanaji Sawant : निवडणुकीत गद्दारी केली तर ठेचून काढू : तानाजी सावंत






