‘तामिळनाडूच्या भूमीवर द्वेषाच्या राजकारणाला स्थान नाही’ ; स्टॅलिन यांची भाजपवर सडकून टीका

Tamil Nadu’s CM MK Stalin । तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली . या बैठकीत त्यांनी आगामी २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कारस्थानांना हाणून पाडण्यासाठी आणि राज्य वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
एमके स्टॅलिन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले Tamil Nadu’s CM MK Stalin ।
फेब्रुवारीमध्ये इरोड पूर्व पोटनिवडणुकीत पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी नुकतेच इरोड दक्षिण जिल्ह्यातील द्रमुक युनिटने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या ऑनलाइन सत्कार समारंभात भाग घेतला. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र, स्टॅलिन यांचे भाषण काल प्रसिद्ध झाले.
यावेळी स्टॅलिन यांनी, “भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे कट उधळण्यात तामिळनाडू आणि द्रमुक आघाडीवर आहेत. म्हणूनच ते अनेक प्रकारे आपल्यासाठी नवीन शत्रू निर्माण करतील आणि नाटकही करतील. आपण हे ७५ वर्षांपासून घडताना पाहिले आहे. त्यांच्या सर्व रणनीती उधळण्याची शक्ती आपल्यात आहे आणि ती शक्ती तुम्ही (कार्यकर्ते) आहात. ” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला.
‘तामिळनाडूच्या भूमीवर द्वेषाच्या राजकारणाला स्थान नाही’ Tamil Nadu’s CM MK Stalin ।
स्टॅलिन पुढे म्हणाले, “द्रमुक कार्यकर्त्यांनी हे सिद्ध केले आहे की पेरियार ईव्ही रामास्वामी यांच्या स्वाभिमान चळवळीच्या भूमीवर द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना स्थान नाही.” यादरम्यान, त्यांनी २०१८ पासून तामिळनाडूमध्ये झालेल्या सर्व निवडणुका द्रमुकने कशा जिंकल्या आहेत हे सांगितले. याशिवाय, त्यांनी राज्य सरकारच्या ४ वर्षांच्या पूर्णतेचा आणि इरोड पूर्व पोटनिवडणुकीत अलिकडेच मिळालेल्या विजयाचाही उल्लेख केला.
पुढे ते म्हणाले, “हे आमच्या सरकारसाठी जनमत चाचणी आहे. पुढील एका वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या काळात आम्हाला विरोधी पक्षांच्या अनेक कटांना तोंड द्यावे लागणार आहे. ते आम्हाला पराभूत करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत आणि आमच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. आम्ही इतिहासात अनेक विजय आणि पराभव पाहिले आहेत, परंतु आम्ही आमचा विजय डोक्यावर घेतला नाही किंवा आमच्या पराभवाने आम्ही खचलो नाही. त्याऐवजी, तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणुकीसाठी कठोर परिश्रम केले आहेत. चला तर मग २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पक्षाला ऐतिहासिक विजय देऊया.” असे विश्वासपूर्ण भाषण करत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नव्याने जोश निर्माण केला.





