भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ मध्ये चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. बुधवारी ऍडिलेडमध्ये झालेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ४४ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या होत्या. विराटला त्याच्या कामगिरीसाठी सामन्यानंतर सामनावीर म्हणून गौरवण्यातही आले. कोहलीच्या या कामगिरीनंतरही माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने त्याच्यावर एका प्रकरणाद्वारे टीका केली आहे.
“भारताला हरवले तर मी लग्न करेल…”, पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेला ऑफर
या सामन्यादरम्यान कोहलीने भारताच्या फलंदाजीवेळी नो-बॉलबाबत पंचांकडे तक्रार केल्याचे दिसले होते. त्या घटनेचा संदर्भ देत गंभीरने विराटवर निशाणा साधला. “फलंदाजाने नो बॉलसाठी अंपायरला बोलू नये. त्याने फक्त फलंदाजी करण्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे गंभीर म्हणाला.
गंभीरने विराटबाबत बोलताना सांगितलेली ही घटना भारताची फलंदाजी सुरु असताना घडली होती. विराट कोहली १६ व्या षटकात फलंदाजी करत होता. त्यावेळी बांगलादेशचा हसन महमूद गोलंदाजीवर असताना त्याने बाउन्सर चेंडू टाकला. यावर कोहलीने चेंडू खेळून धाव घेतली, मात्र त्याने उंचीच्या कारणामुळे अंपायरकडे नो-बॉलची अपील केली. यावर अंपायरने लगेच तो नो-बॉल दिला. यामुळे बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन नाराज असल्याचेही दिसले.
गंभीरने कोहलीच्या खेळाची प्रशंसाही केली
गंभीरने केवळ विराटवर टीका केली असे नाही. त्याने कोहलीच्या फलंदाजीचेही कौतुक केले आहे. गंभीर म्हणाला कि, “विराट कोहलीला खेळाडूंसोबत भागीदारी कशी करायची हे चांगल्याप्रकारे माहीत आहे. त्याने प्रत्येक सामन्याचा शेवटी चांगलाच खेळ केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आऊट झाल्यानंतर विराटानेच संघाला सावरले. त्यामुळेच तो बाबर आझम, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि जो रूट यांच्यापेक्षा सरस खेळाडू आहे.
Gautam Gambhir expresses his opinion on difference between Virat Kohli and other batters.#GautamGambhir #ViratKohli #T20WorldCup #CricketTwitter pic.twitter.com/0ir0s2UXrN
— CricTracker (@Cricketracker) November 2, 2022