Stray Dog : भटक्या कुत्र्यांवर बंदी घालणे अमानावीय आहे; राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांना हटवणे हे मानवीय आणि वैज्ञानिक धोरणापासून एक पाऊल मागे जाणे आहे. हे मूक आत्मे ही समस्या नाही, जी दूर करता येईल. निवारा, नसबंदी, लसीकरण आणि सामुदायिक काळजीद्वारे कोणत्याही क्रूरतेशिवाय रस्ते सुरक्षित ठेवता येतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर पूर्ण बंदी घालणे क्रूर-अदूरदर्शी आहे. आपली करुणा यामुळे नाहीशी होत आहे. सार्वजनिक सुरक्षा आणि प्राणी कल्याण एकत्र येतील याची आपण खात्री करणे आवश्यक आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दिल्ली-एनसीआरमधून सर्व भटक्या कुत्र्यांना काढून टाकण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी आपले मत दिले आहे.
केवळ राहुल गांधीच नाही तर माजी पर्यावरण मंत्री मनेका गांधी यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या, दिल्लीत तीन लाख भटके कुत्रे आहेत. त्या सर्वांना पकडून निवारा गृहात पाठवले जाईल. त्यांना रस्त्यांवरून हटवण्यासाठी दिल्ली सरकारला १ हजार किंवा २ हजार निवारा गृहे बांधावी लागतील. कारण अनेक कुत्रे एकत्र ठेवता येत नाहीत. सर्वप्रथम, त्यासाठी जमीन शोधावी लागेल. त्यासाठी सुमारे ४-५ कोटी रुपये खर्च येईल. कारण प्रत्येक केंद्रात काळजीवाहू, स्वयंपाकी आणि जेवण देणारे आणि चौकीदार यांची व्यवस्था करावी लागेल.
मनेका गांधी पुढे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश रागाच्या भरात आणि व्यवहार्यता विचारात न घेता देण्यात आला असावा. त्यांनी या निर्णयाच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाले की, फक्त एक महिन्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने याच मुद्द्यावर संतुलित निर्णय दिला होता. आता, एक महिन्यानंतर, दोन सदस्यांच्या खंडपीठाने सर्व भटक्या कुत्र्यांना पकडा असा दुसरा निर्णय दिला आहे. कोणता निर्णय योग्य आहे? अर्थात, पहिला, कारण तो एक स्थापित निर्णय आहे.
समाज माध्यमांतही टीका
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर केवळ राजकारणीच नाही तर सामान्य लोकही नाराज आहेत आणि त्याची झलक सोशल मीडियावर दिसत आहे. सोशल मीडियावर लोक सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आवाज उठवत आहेत. तथापि, काही लोक असे आहेत जे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आठ आठवड्यांच्या आत रस्त्यावरून सर्व भटक्या कुत्र्यांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर ही सर्व चर्चा सुरु आहे.





