Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मुख्य बातम्या

लक्षवेधी: राजनाथ सिंह यांचे भाषणास्त्र

by प्रभात वृत्तसेवा
August 22, 2019 | 6:30 am
A A
पाकिस्तान भारताचा शेजारी हीच मोठी समस्या

हेमंत देसाई

हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्‍मीरसंबंधात पाकिस्तानवर हल्लाबोल केला. अर्थात, निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे वक्‍तव्य केले असण्याची जास्त शक्‍यता दिसते.

पाकिस्तान जोवर अतिरेक्‍यांवर कारवाई करत नाही आणि या कारवायांना समर्थन देणे थांबवत नाही, तोपर्यंत त्या देशाशी वाटाघाटी केल्या जाणार नाहीत; परंतु चर्चेची वेळ आलीच, तर ती केवळ पाकव्याप्त काश्‍मीरच्या मुद्द्यावरच केली जाईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हरियाणातील काल्का येथे केले आहे. त्याआधी, राजस्थानातील पोखरण येथे 1998 साली जी आण्विक चाचणी झाली त्या ठिकाणी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजनाथ सिंह गेले होते. तेव्हा ते म्हणाले की, अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे धोरण कायम आहेच. परंतु भविष्यात कोणती परिस्थिती उद्‌भवते, त्यावर ते धोरण अवलंबून असेल, या दोन वक्‍तव्यांवरून हे स्पष्ट होते की, भारताने पाकबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

1998 मध्ये भारताने अण्वस्त्रसिद्धता प्राप्त केल्यानंतर, अण्वस्त्रांबाबत “नो फर्स्ट यूज’ धोरण तयार केले. शत्रूदेशाने आपल्याविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही, तोवर आपण अण्वस्त्रांचा वापर करायचा नाही, हे ते धोरण आहे. वास्तविक भारताला धडा शिकवण्याची, त्याच्याविरुद्ध अण्वस्त्र वापरण्याची धमकी पाकिस्तान वारंवार देत असतो. त्यांच्या एका माजी संरक्षणमंत्र्याने अण्वस्त्र टाकून भारत उद्‌ध्वस्त करण्याच्याही वल्गना केल्या होत्या.

खरे तर, भारत व पाकिस्तान हे शेजारी देश आहेत. या दोन देशांत सलोख्याचे संबंध असणे हितावह आहे. परंतु पाकला ते नको आहे. त्यात भारताने काश्‍मीरसंबंधी 370वे कलम जवळपास मोडीत काढल्याने, पाकचा जळफळाट झाला आहे. जम्मू-काश्‍मीरचे काय करायचे, तिथे कोणती कलमे लावायची आणि कोणती काढायची, हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे; परंतु हा प्रश्‍न युनोच्या सुरक्षा समितीत चर्चेस आला. त्यामुळे या प्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यात, आपण कसे यशस्वी झालो, अशी पाकिस्तान स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे.

युनोच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काश्‍मीरच्या प्रश्‍नावर केवळ अनौपचारिक चर्चा झाली आणि कोणताही ठराव झाला नाही. या बैठकीस ना भारत, ना पाकिस्तान हजर होता. सुरक्षा समितीच्या 15 सदस्यांपैकी, चीन सोडून इतर देशांनी विशेष तोंडही उघडले नाही. काश्‍मीर हा दोन देशांतील विषय असून, त्यांनीच वाटाघाटींच्या माध्यमातून त्यातून मार्ग काढावा, अशीच भूमिका युनोने मांडली. तेव्हा पाकिस्तानशी चर्चा आम्ही करू. पण आधी पाकने काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया थांबवाव्यात, हीच भारताची भूमिका आहे, असे मत युनोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी मांडले.

चीन व पाकिस्तान यांनी पत्रकारांना उत्तरे देण्याचे नाकारले. उलट अकबरुद्दीन यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्‍नांना समर्पक उत्तरे दिली. तसेच प्रथम पाक पत्रकारांना सवाल विचारण्याची संधी त्यांनी दिली. काश्‍मीरच्या प्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे पाकचे इरादे पूर्णतः फसले. उलट अकबरुद्दीन यांनी पाकिस्तान व भारत यांच्या धोरणात व वर्तनात गुणवत्तेच्या दृष्टीने कसा फरक आहे, हे जगाला दाखवून दिले. या प्रकारची राजनीती भारताच्या दृष्टीने फायद्याची आहे.

परंतु राजनाथ सिंह यांनी अण्वस्त्रांबाबत वापरलेली भाषा अनाठायी होती. दोन्ही बाजूचे आक्रमक राष्ट्रवादी आगीत तेल ओतू लागले, तर त्याची झळ दोघांनाही बसणार आहे. 18 मे 1974 रोजी पोखरण येथे भारतीय अणुशास्त्रज्ञांनी पहिली अणुचाचणी यशस्वी करून, भारताची अण्वस्त्रसिद्धता सिद्ध केली. त्यावेळी भारताला टीकेलाही सामोरे जावे लागले होते; परंतु आपण शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेच्या उपयोगाबाबतचे धोरण जाहीर करून, जागतिक समुदायाच्या टीकेची धार बोथट केली. 1962 ते 72 या दहा वर्षांच्या काळात भारताला चिनी व पाकिस्तानी आक्रमणांचा सामना करावा लागला होता. 1964 मध्ये चीन अण्वस्त्र सज्ज झाला होता. तर 1971च्या बांगलादेश मुक्‍ती युद्धातील पराभवानंतर, पाकने चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्जतेच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले होते.

या पार्श्‍वभूमीवर, आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने भारताला अण्वस्त्रसज्ज होण्याची गरज निर्माण झाली होती. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांच्या नेतृत्वाखाली भारताचे अणुशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आण्विक संशोधनात लक्षणीय प्रगती केली होती. डॉ. रामण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा पहिला अणुबॉम्ब विकसित झाला होता. त्यामुळे आण्विक चाचणीसाठी शास्त्रज्ञ उत्सुक होते. म्हणूनच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.

स्वतः इंदिरा गांधी, त्यांचे राजकीय सचिव पी. एन. हक्‍सर व पी. एन. धर, संरक्षण मंत्रालयाचे विज्ञान सल्लागार डॉ. नाग चौधरी आणि डॉ. सेठना व डॉ. रामण्णा अशा केवळ सहाजणांनाच या निर्णयाची माहिती होती. तेव्हा संरक्षणमंत्री के. सी. पंत होते. ही चाचणी केल्यानंतर, “आम्ही पाकिस्तान अणुबॉम्ब टाकून खाक करू,’ वगैरे भाषा श्रीमती गांधींनी कधी केली नाही. उलट भारत अणुशक्‍तीचा उपयोग विकासासाठीच करणार आहे, याची ग्वाही इंदिरा गांधींनी जगाला दिली. हा वारसा लक्षात ठेवून भारताने जबाबदारीने वर्तन केले पाहिजे.

राजनाथ सिंह यांच्या वक्‍तव्यातच आपले धोरण पाळण्याच्या वचनाचा भंग आहे. भारत अण्वस्त्राचा प्रथम वापर करणार नाही, असे एकदा म्हटल्यावर, परिस्थितीशी त्याचा संबंध पोहोचत नाही. परिस्थिती बदलली तर, असे म्हणणे म्हणजे, आपल्या धोरणावरून परत फिरणे, हे धोरणच सोडून देणे आहे.

फक्‍त पाकव्याप्त कश्‍मीरवरच चर्चा करणार, हेसुद्धा भारताचे बदललेलेच धोरण आहे. वाजपेयी व डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणाच्या पलीकडे जाऊन केलेला हा साहसवाद आहे. हरियाणात विधानसभा निवडणुका असल्यामुळेच राजनाथ सिंह दे दणादण भाषणे करत आहेत. बालाकोटमुळे लोकसभेत यश मिळाले. आता काश्‍मीरच्या मुद्द्यावरून केलेल्या राजकारणाचा हरियाणा, महाराष्ट्र वगैरे राज्यांतील विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठीच हे सर्व केले जात आहे.

Tags: editorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?
अग्रलेख

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?

6 days ago
कटाक्ष : फुले का पडती शेजारी?
संपादकीय

कटाक्ष : फुले का पडती शेजारी?

6 days ago
नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर
संपादकीय

नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर

6 days ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Breaking News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘एकनाथ शिंदे’ हेच शिवसेनेचे गटनेते

राज्यात मध्यवर्ती निवडणूकाची शक्‍यता – शरद पवार

Covid 19 : गेल्या 24 तासात देशभरात 16 हजार नव्या रुग्णांची नोंद

शिवसनेत “व्हीप वॉर’! नेमक्‍या कोणत्या आमदारांच्या गटावर कारवाई होणार?

#INDvENG 5th Test : सिराज-बुमराहचा भेदक मारा, इंग्‍लंडचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला

उमेश कोल्हे हत्येचा मास्टरमाईंड इरफान शेखला पोलीस कोठडी

विरोधी पक्षनेतेपद अजित पवारांकडेच की शरद पवार मोदी, शाहांप्रमाणे धक्का देणार? ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा

ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधलाय? भारतीय पुरातत्व विभागाने दिली महत्त्वपूर्ण माहिती

सोमवारच्या बहुमत चाचणीसाठी शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत ठरली रणनीती

इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ

Most Popular Today

Tags: editorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!