Special Story On Nitesh Rane : काही वर्षांपूर्वी हिंदुत्व विरोधी भूमिका घेणारे नितेश राणे अचानक हिंदुत्ववादी कसे झाले?

पोलिसांना एक दिवसांची सुट्टी देतो. आम्हाला बघायचंय की दुसऱ्या दिवशीची सकाळ हिंदू बघतात की मुसलमान. मी हिंदूंचा गब्बर आहे. वाकड्यात जायचं नाही कोणी मस्ती केली तर चुन चुनके मारेंगे ही मंत्री नितेश राणे यांची काही वक्तव्ये. सध्या त्यांच्या हिंदुत्वाची आग महाराष्ट्रात धुमसताना दिसत आहे.नितेश राणे मागील दोन वर्षापासून हिंदुत्वाचा आवाज म्हणून आक्रोश मोर्चा काढताना दिसत आहेत. त्यातून ते मुस्लिम समाजाला सातत्याने टार्गेट करत आहेत.
सध्या नितेश राणे यांचे काही जुने ट्विट्स व्हायरल होत आहेत. यामध्ये नितेश राणे संघावर टीका करताना दिसतात तर कधी आपल्या राणे स्टाईल भाषेत सावरकरांना टोला लगावत आहेत तर संभाजी भिडे यांच्या हिंदुत्वाची खिल्ली उडवतानाच्या काही पोस्ट सध्या प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. पण अगदीच पाच सहा वर्षांपूर्वी हिंदुत्व विरोधी भूमिका घेणारे राणे अचानक हिंदुत्ववादी कसे झाले? RSS ला झोडून काढणारी राणेंची भाषा आता आरएसएसची गोडवे कशी काय जाऊ लागली? , शिवाजी महाराजांच्या सोबत एकही मुस्लिम शिलेदार मावळा नव्हता सांगायचं आणि मुस्लिमांना घरात जाऊन मारू असं म्हणायचं धाडस त्यांच्यामध्ये कसे आले याबद्दल आज थोडक्यात जाणून घेऊया…
भाजपचे मंत्री नितेश राणे सध्या चांगलेच फॉर्मत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी नुकतेच घेतलेले काही निर्णय आणि केलेली वक्तव्य.हिंदू खाटीकांसाठी त्यांनी सुरू केलेलं मल्हार सर्टिफिकेट, कबर गायब करणार, शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता अशी अनेक एकामागूने केलेली वादग्रस्त वक्तव्ये आणि चितवणी खोर वक्तव्ये. सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या राणेंनी तब्बल दोन वर्षापासून हिंदू धर्माची बाजू लावून धरली आहे. हिंदू इमेज म्हणून देखील त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. पण दोन वर्षांपूर्वीचा राणेंचा इतिहास तपासून पाहिला तर त्यांनी कधीच हिंदुत्वाची भूमिका मांडली नव्हती किंवा ती भूमिका घेतली नव्हती. याउलट राणेंची अनेक वक्तव्य हिंदू विरोधी असल्याचं बोललं गेलं होतं. ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत मर्यादित राजकारण ठेवणारे नितेश राणे अचानक हिंदूंचे मसीहा कसे झाले तर ते पण जरा पाहूया…
लंडन मधून एमबीए केलेले नितेश राणे महाराष्ट्रात परतले हा काळ 2005 चा असावा. राणेंनी तेव्हा शिवसेनेत बंड केलं होतं. वडिलांच्या राजकीय कारकीर्दीला सावरण्यासाठी नितेश राणेंनी देखील राजकारणात उडी घेतली. स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून नितेश राणे यांनी तळ कोकण पिंजून काढला. रोजगार मेळावे, महागाई पासून ते सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक प्रश्नांसाठी उभारलेली आंदोलन आणि मराठा आरक्षणासाठी काढलेले मोर्चे यांच्या माध्यमातून नितेश राणे यांनी आपला पॉलिटिकल स्पेस तयार करायला सुरुवात केली होती.
नितेश राणे यांचा इतिहास चाळून पाहिला तर नितेश राणे यांचा वैचारिक सामाजिक वारसा कधीच जहाल हिंदुत्वाचा नव्हता. उलट नारायण राणे ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले होते त्या काळात नितेश राणे देखील त्यांच्यासोबत होते. यानंतर भाजपच्या हिंदुत्वावर राणेंनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि ठाकरे यांची शिवसकाळ करणं यापुढे शक्य नव्हतं म्हणूनच पक्षात आपला पर्टिकल बेस तयार करण्यासाठी नितेश राणे यांनी हिंदुत्वचा मुद्दा हाताशी धरला असावा. लोकसभा निवडणुकीच्या वर्षभर आधीपासूनच लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी रान पेटवलं. महाराष्ट्र फिरून हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले. नवजीवन करणारे मानसिकतेचे हिरवे साप आहेत त्यांना इशारा द्यायचा आहे की आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहणं बंद केलं नाही तर तुमच्या घरात अब्बा देखील तुम्हाला ओळखणार नाही अशी अवस्था करू असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता.
यानंतर राणेंना धर्म संसद आणि हिंदू धर्मातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाऊ लागलं. प्रत्येक दिवस जसा जाऊ लागला तसे राणे आणखीनच मुस्लिम विरोधी बनत गेले. मंत्रीपदावर असतानाही राणे यांच्या या भूमिकेत काडी मात्र बदल झालेला नाही. त्यांची भूमिका मल्हार सर्टिफिकेट आणि धर्मांतर बंदी कायदा यांसारख्या निर्णयांच्या माध्यमातून दिसते. मात्र त्यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून येऊन बसलेल्या राष्ट्रवादीला आता राणेंच्या या भूमिकेचा प्रॉब्लेम होताना दिसत आहे. मात्र एकंदरी चित्र पाहायला मिळते नितेश राणे हे भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी म्हणून समोर आलेत.
ज्या ज्या ठिकाणी हिंदूंचा आवाज दाबला जातो कुठल्याही अत्याचाराची घटना घडते तिथं नितेश राणे जाऊन धडकतात. मग कुठल्याही कानाकोपऱ्यात ते कुठेही गेले तरी हिंदूवादी संघटना कार्यकर्त्यांचा मोठा गराडा अवतीभोवती जमताना दिसतो. पण राणेंचे हिंदुत्व खरं असेल तर मग भाजपात येण्याच्या आधी ते नेमकं गेलं कुठं होतं? काही खास जबाबदारी दिली म्हणूनच राणे हिंदुत्ववादी झालेत की खरंच त्यांनी हिंदूंच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याचा पण स्वतःशी केला आहे हे येणाऱ्या काही दिवसांत समजेलच. राणे खरच कट्टर हिंदुत्ववादी आहेत की राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांनी नाईलाजाने अशी भूमिका घेतली हे येणाऱ्या काळात समजेलच…





