Israel vs Iran War : इस्राइल आणि अमेरिकडून संयुक्तपणे इराणवर हवाई केले जात आहेत. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, येत्या काही दिवसांत संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे सूतावोच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump )यांनी दिले आहेत. या हवाई हल्ल्याचा फटका दुबईला देखील बसला आहे. दुबईत हवाई केले जात आहेत. यानंतर दुबईने हवाई क्षेत्र बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे दुबईला फिरण्यासाठी गेलेले अनेक भारतीय प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. अशातच २ मार्चच्या मध्यरात्री सुमारे दोन वाजता दुबईहून एक फ्लाइट मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. या विमानातून महाराष्ट्रातील नागरिक परत आपल्या मायदेशी परतले आहेत. यातील एका प्रवाशाने दुबईमधील थरारक अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितला. अजय नावाच्या प्रवाशांने एनआयसोबत संवाद साधताना सांगितले, “आम्ही मुंबईहून हैदराबाद आणि तेथून दुबईला पोहोचलो होतो. दुबईहून आमची पुढील फ्लाइट अमेरिकेसाठी होती. आम्ही सर्वजण विमानात बसलोही होतो. जेव्हा विमानाने उड्डाण घेतले नाही तेव्हा चौकशी करण्यात आली. सुरुवातीला काही तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही तासांनी आम्हाला सांगण्यात आले की युद्ध सुरू झाले आहे, त्यामुळे सध्या उड्डाण करता येणार नाही.” पुढे बोलताना प्रवासी म्हणाला की, अचानक विमान उड्डाण रद्द करण्यात आल्यानंतर विमानतळावर मोठी धावपळ उडाली. परिस्थिती गंभीर झाली होती. विमानतळावर आल्यानंतर आम्हाला हॉटेलपर्यंत सोडण्यात आले. मात्र त्यानंतरही आम्ही संपूर्ण रात्र हॉटेलच्या शोधात भटकत राहिलो. या दरम्यान बॅाम्बस्फोटांचे आवाजही ऐकले. तसेच बुर्ज खलिफा परिसरात धुराचे लोटही पाहिले. या काळात आम्हाला हॉटेलमधून बाहेर पडण्यास आणि खिडक्यांजवळ उभे राहण्यास सक्त मनाई करण्यात आली होती, अशी भीषण परिस्थिती प्रवाशाने सांगितली. आम्ही जेवण न करता फक्त आमच्या खोलीतच थांबत होतो. बाहेर नेमके काय सुरू आहे, याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. हॉटेलमध्ये जागा न मिळाल्यामुळे अनेकजण जिथे जागा मिळेल तिथे राहत होते, अशी विदारक परिस्थिती तिथे असल्याचे अजय या प्रवाशाने सांगितलेल्या थरारक अनुभवावरून लक्षात येते. अजय यांनी आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून आवाहन (Israel vs Iran War) आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357 हेही वाचा : Hina Khan Post : “देशाचा कार्यभार सांभाळणाऱ्या नेत्यावर…”; हिना खानची पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ पोस्ट