Shubman Gill Reaction : “आम्ही २५० षटकं मैदानात घाम गाळला, पण…”; कोलंबो कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार गिलची प्रतिक्रिया
Shubman Gill Reaction : कोलंबो कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

Shubman Gill Post Match Press Conference IND vs SL Colombo Test Drawn : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटी सामना अनिर्णित राहिला असला तरी, भारताने दोन सामन्यांची ही मालिका १-० ने खिशात घातली आहे. पहिल्या डावात २१३ धावांची आघाडी घेत फॉलोऑन लादल्यानंतरही श्रीलंकेच्या फलंदाजांनी कडवी झुंज देत सामना अनिर्णित राखला. या ऐतिहासिक विजयाची संधी हुकल्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच, भारतीय कर्णधार शुबमन गिलने (Shubman Gill) सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. २५० षटकांपेक्षा जास्त वेळ क्षेत्ररक्षण करूनही आम्ही शर्थीचे प्रयत्न केल्याचे गिलने नमूद केले.
‘त्यांच्याकडे कौशल्य आणि नशीब दोन्ही होते!’; गिलकडून श्रीलंकेचे कौतुक
सामन्यानंतर बोलताना शुबमन गिल म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्ही सलग तीन दिवस जवळपास २५० षटके क्षेत्ररक्षण केले आणि जे शक्य होते ते सर्व प्रयत्न केले. श्रीलंकेच्या फलंदाजांनी विशेषतः सोनल दिनुशाने अविश्वसनीय फलंदाजी केली. त्यांच्याकडे कौशल्य तर होतेच, सोबत नशिबाचीही साथ लाभली. त्यामुळे आम्ही यापेक्षा वेगळे काही करू शकलो असतो असे वाटत नाही. प्रचंड दडपणाखाली त्यांनी ज्या पद्धतीने पुनरागमन केले, त्यातून आम्हालाही खूप काही शिकायला मिळाले.”
फॉलोऑन देण्याचा निर्णय चुकला का? कर्णधाराचे रोखठोक उत्तर
🔴WE STILL BELIEVE – SHUBMAN GILL’S WTC QUALIFICATION CHANCES 🤯
🎙️: Gill says the upcoming New Zealand series in November will be crucial for India’s WTC qualification hopes.
If we have a good NZ series, as long as we have a chance, we always keep believing and hopefully… pic.twitter.com/PwHsytsWkx
— Sam (@cricsam02) August 27, 2026
फॉलोऑन लादण्याच्या निर्णयावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिल म्हणाला, “सामना संपल्यानंतर मागे वळून पाहताना अनेक गोष्टी सोप्या वाटतात. मात्र पाचव्या दिवशी हवामानाची स्थिती आणि पाऊस पडण्याची शक्यता पाहता त्या क्षणी जो सर्वोत्तम निर्णय वाटला, तोच आम्ही घेतला. काही गोष्टी मैदानात मनासारख्या घडल्या नाहीत, तरीही शेवटी हा खेळ आहे आणि आज खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेट जिंकले आहे.”
पडिक्कल, राहुल आणि सुथारचे कौतुक; न्यूझीलंड दौऱ्याकडे नजर!
A victory in the first Test at Galle and a closely contested second Test ending in a draw at Colombo.
India win the Series 1–0. #SLvIND pic.twitter.com/SjCwxmZtIS
— BCCI (@BCCI) August 27, 2026
मालिकेतील सकारात्मक बाबींवर प्रकाश टाकताना गिलने देवदत्त पडिक्कल, केएल राहुल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या कामगिरीचे कौतुक केले. पदार्पणवीर फिरकीपटू मानव सुथारबाबत बोलताना तो म्हणाला, “सुथार सातत्यपूर्ण मारा करत असून भविष्यात तो भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज ठरेल.” वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याबाबत गिलने आत्मविश्वास व्यक्त केला असून, नोव्हेंबरमधील न्यूझीलंड दौऱ्यावर चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत स्थान मिळवू, असा विश्वास व्यक्त केला.





