Shashikant Shinde : बुध जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपणारा गट असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ((Shashikant Shinde) विजयी झालेल्या लता अविनाश कर्णे यांची बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्ष आणि बुध गटातील जनतेशीच आहे, भाजपशी नाही, याचे भान त्यांनी ठेवावे. आज रात्रीपर्यंत स्वतःहून राष्ट्रवादीत परत यावे, अन्यथा राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट आणि परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी मांडली. ललगुण येथे बुध जिल्हा परिषद गटातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुध गटातील अलीकडील राजकीय घडामोडींवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले की, केंद्र आणि राज्यात भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचे लोण आता बुध जिल्हा परिषद गटापर्यंत पोहोचले आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून लता अविनाश कर्णे यांना जनतेच्या प्रचंड विश्वासावर भरघोस मतांनी विजयी केले. मात्र राष्ट्रवादी पक्षाशी असलेली बांधिलकी सोडून भाजपसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय हा मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा देणारा असल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेतही नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनीही यावेळी आपल्या भाषणात खटाव तालुका ही हुतात्म्यांची भूमी असल्याचे सांगितले. खटाव तालुका आणि बुध जिल्हा परिषद गटातील जनता स्वाभिमानी असून सन १९६० पासून या गटावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. Shashikant Shinde लता अविनाश कर्णे यांना राष्ट्रवादीने निवडून आणले असल्याने त्यांची नैतिकदृष्ट्या बांधिलकी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि गटातील मतदारांशी आहे. त्यांनी राष्ट्रवादीसोबतच राहावे, अन्यथा गद्दारीचा शिक्का कायमचा बसू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. डिस्कळ येथे कार्यकर्त्यांचा मेळावा व्हावा अशी मागणी केली होती. मात्र लता कर्णे यांचे सासरे बापूसाहेब कर्णे हे अत्यंत प्रामाणिक आणि राजकारणात प्रगल्भ व्यक्तिमत्त्व असल्यामुळेच आजची बैठक ललगुण येथे घेण्यात आली आहे. या बैठकीत लता अविनाश कर्णे यांच्या निवडणुकीच्या कालावधीत घडलेल्या विविध घटनांची सविस्तर माहितीही देण्यात आली. राष्ट्रवादीचे काही पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान एका जबाबदार नेत्यांकडून लता कर्णे या आमदार शशिकांत शिंदे सांगतील त्यांनाच लता कर्णे मतदान करतील, असेही सांगण्यात आले. जर निवडणूक लढवण्याची ताकदच नसेल तर निवडणूक लढवू नये, अशा शब्दांत काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनीही अविनाश कर्णे यांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्णेनी सदस्य पदाचा राजीनामा द्यावा : घार्गे बुध जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लता अविनाश कर्णे यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. त्यांच्या यशात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आणि संघटना आणि जनतेच्या मतांचा मोठा वाटा आहे. पक्षाने सर्वतोपरी ताकद दिल्यामुळे हा विजय शक्य झाला. त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीने राष्ट्रवादीसोबत राहणे स्वाभाविक आहे. मात्र राष्ट्रवादीसोबत राहायचे नसेल, तर ज्या राष्ट्रवादी पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडून आले आहेत, त्या जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याची कोणतीही अडचण नाही, असे स्पष्ट केले आहे. – माजी आ.प्रभाकर घार्गे ‘बुध रसद पॅटर्न’चा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग : विधाते बुध जिल्हा परिषद गटातील उमेदवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावरती उभे होते. दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने सर्व ताकद या उमेदवाराच्या पाठीशी उभे करून विजयी करण्यात पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. परंतु राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विरोधी भाजपकडून रसद घेणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. उमेदवारी एका पक्षाकडून रसद विरोधी भाजपकडून घेणे हे एकमेव महाराष्ट्रातील पहिले उदाहरण असेल. या ‘बुधच्या रसद पॅटर्न’ची संपूर्ण सातारा जिल्ह्यात रंगली आहे. – प्रदिप विधाते माजी उपाध्यक्ष जि.प.सातारा भाजपकडून सत्तेचा गैरवापर : आ.शिंदे सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एका विचाराने लढली असून दोन्ही पक्षांच्या मिळून सत्ता स्थापन होणार आहे. झेडपीत सदस्य कमी पडल्यास मदतीसाठी बुध गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना भाजपच्या एका मंत्र्याकडून जाणीवपूर्वक रसद पुरवण्यात आली, जेणेकरून उमेदवार उपकाराच्या ओझ्याखाली दबला जावा. सातारा जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कौल दिल्यामुळे भाजपने लोकशाही मूल्ये मान्य करणे आवश्यक आहे. फक्त सत्तेचा गैरवापर फक्त सत्ता मिळवण्यासाठी केला नाही पाहिजे. – आ.शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष हे पण वाचा : PNG Gas Holder : पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! पीएनजी गॅसधारकांचा सिलिंडर पुरवठा बंद