Sachin Ahir : सचिन अहिर यांची आमदारकी जाणार? ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये
Sachin Ahir : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाला मोठा धक्का देत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे.

Sachin Ahir : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का देत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी आज अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अहिर यांनी पक्ष सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर ठाकरे गटानेही तातडीने कारवाईची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. (Sachin Ahir)
विधान परिषद अध्यक्षांकडे तक्रार दाखल होणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन अहिर यांच्या पक्षांतराविरोधात ठाकरे गट लवकरच विधान परिषद अध्यक्षांकडे कारवाईची मागणी करणारे पत्र सादर करणार आहे. यासंदर्भात पक्षाने कायदेशीर सल्लाही घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत सचिन अहिर यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Sachin Ahir)
शिंदे गटात प्रवेशानंतर काय म्हणाले सचिन अहिर?
शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले, “मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. कोळशातून हिऱ्याची चमक ओळखून त्याला संधी दिली जाते, त्यातूनच नवं विश्व घडतं. (Sachin Ahir)
शिंदे यांनी मला विधान परिषद उपसभापतीपदाची संधी देऊन तळागाळातील कार्यकर्ताही मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे दाखवून दिले. सरकारमध्ये राहून विकासकामे करणे महत्त्वाचे असते. आता त्यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळातही प्रभावीपणे काम करणार आहे.” (Sachin Ahir)
ठाकरे गटावरही अप्रत्यक्ष टीका
उद्धव ठाकरे नेत्यांना वेळ देत नाहीत, अशी चर्चा अनेकदा होत असते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सचिन अहिर यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र ते म्हणाले, “माझा तसा अनुभव नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे काम करत आहेत, हेच मोठं आकर्षण आहे. खासगीत अनेक लोकप्रतिनिधींशी बोललात तर तेही हेच सांगतील. असा नेता सोबत असेल तर काम करण्याची प्रेरणा मिळते. काही लोकांनी आयुष्यात कधी दगडही उचलला नाही, ते आम्हाला शिकवू लागले तर ते योग्य नाही.” (Sachin Ahir)






