Rohit Gambhir Rift : वानखेडेवर झालेली मैत्री ऑस्ट्रेलियात कशी तुटली? रोहित-गंभीरमधील अंतर्गत वादाचा सर्वात मोठा खुलासा
Rohit Gambhir Rift : एका ताज्या अहवालानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Goutam Gambhir) आणि रोहित शर्मा यांच्यातील नातेसंबंध काळानुरूप कमालीचे बिघडले आहेत.

Rohit Sharma Gautam Gambhir Rift Dressing Room Politics IND vs ENG Lords ODI : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधील निवृत्तीच्या चर्चांना बीसीसीआयने जरी पूर्णविराम दिला असला, तरी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील अंतर्गत वादाबाबत आता एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. एका ताज्या अहवालानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Goutam Gambhir) आणि रोहित शर्मा यांच्यातील नातेसंबंध काळानुरूप कमालीचे बिघडले असून, निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांच्यासोबतही रोहितचे खटके उडाल्याचे दावे केले जात आहेत.
‘तू कप्तान राहिलास तरच मी येईन’ ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वाद-
‘पीटीआय’च्या (PTI) वृत्तानुसार, २०२४ मध्ये जेव्हा गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक बनवण्याची चर्चा सुरू होती, तेव्हा स्वतः रोहितने वानखेडे स्टेडियमवर ट्रेनिंग दरम्यान गंभीरला संघात येण्याची विनंती केली होती. त्यावेळी गंभीर म्हणाला होता, “जर तू कर्णधार राहिलास, तर मी नक्कीच येईन.” मात्र, त्यानंतर समीकरणे झपाट्याने बदलली. दोघांमधील मतभेदांची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील ३-० अशा व्हाईटवॉशनंतर झाली आणि ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान हा तणाव पराकोटीला पोहोचला. रोहित खराब फॉर्ममुळे सिडनी कसोटीतून बाहेर बसण्याचा निर्णय घेत होता, ज्याला निवड समितीचा विरोध होता.
निवृत्ती घेणार होता, पण मुलाखतीने वाढवला सस्पेन्स-
अहवालानुसार, रोहित शर्मा कसोटी क्रिकेट सोडून दुसऱ्याच दिवशी निवृत्ती जाहीर करण्याच्या विचारात होता. मात्र, त्यानंतर ब्रॉडकास्टर्सना दिलेल्या एका मुलाखतीत रोहितने अचानक म्हटले, “मी दोन मुलांचा पिता आहे आणि माझ्यासाठी काय योग्य आहे, हे मला चांगले ठाऊक आहे.” रोहितचे हे वक्तव्य ऐकून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित अगरकर दोघेही प्रचंड चक्रावून गेले होते.
वनडे कर्णधारपद गेल्याने रोहित प्रचंड नाराज –
गेल्या वर्षी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही रोहित शर्माला अचानक वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. गंभीर आणि अगरकर या दोघांचाही रोहितला कर्णधारपदावरून हटवून शुबमन गिलकडे धुरा सोपवण्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा होता. जेव्हा रोहितला या निर्णयाची माहिती देण्यात आली, तेव्हा तो कमालीचा नाराज झाला होता आणि त्यानंतर संघ व्यवस्थापनासोबत झालेली त्याची चर्चा अत्यंत कटू ठरली होती, असे या रिपोर्टमध्ये समोर आले आहे.





