Rain update : महाराष्ट्रातील प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू ! कोकण, मुंबई, पुणे, नाशिकला जोरदार सरींचा अंदाज

Rain update – राज्यातील प्रमुख उजनी, खडकवासला, गंगापूर, दारणा, नांदूर-मध्यमेश्वर आणि इतर मध्य-महाराष्ट्रातील धरणांमधून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू आहे. यामुळे पुणे–मुठा नदी परिसर, नाशिकमधील नदीकाठ व ग्रामीण भाग, तसेच सोलापूर–पंढरपूर मार्ग, या क्षेत्रांत सतर्कता आवश्यक आहे.
स्थानिक प्रशासनाने बचाव तथा आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्जता ठेवली आहे. नागरिकांनी प्रशासनिक सूचना पाळून सतर्क राहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
उजनी धरणात जलस्तर ७७% एवढा झाला असून; ३०,००० क्युसेक्स दराने भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रानिमित्त सुरक्षेच्या हेतूने करण्यात आला आहे.
खडकवासला धरण (पुणे), सध्या ६४% साठा, आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ६,८८४ क्युसेक्स दराने मुठा नदीत पाणी सोडले जात आहे. तर गंगापूर धरणातून आतापर्यंत विसर्ग सुरू असून, सुरुवातीला ५३०–१,१६० क्युसेक्स दराने, नंतर वाढून २,३२० क्युसेक्स झाली आहे. यासह, दारणा धरणातूनही सुमारे ४,७४२ क्युसेक्स दराने विसर्ग सुरू आहे.
कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी !
कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सरासरीपेक्षा 30-40% अधिक पाऊस पडला आहे. तसेच या भागासाठी हवामान विभागाने आधीच ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
तसेच या भागात दरड कोसळण्याचा धोका देखील वाढला आहे. विभागातील नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





