पुणे जिल्हा : अखेर ‘त्या’ रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात ; निकृष्ट कामेही परत नव्याने होणार

शिरूर : शिरूर – पाबळ भीमाशंकर रस्ता राज्यमार्ग १०३ यावरील कोंढाण-ओढा पुलावरील झालेली निकृष्ट कामे आणि आमदाबाद ते मलठणपर्यंत झालेले डांबरी रस्त्याचे निकृष्ट काम याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग ,पुणे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सदर तक्रार अनुषंगाने तात्काळ चौकशीचे सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.
त्याअनुषंगाने शिरूर उपविभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कोंढाण-ओढ्यावरील कामाची पाहणी करून सध्या पावसाळा असल्याने सदर कामाची तात्कळ खड्डे भरणे भराव दुरुस्ती ची कामे सुरू केली असून पुढे पावसाचे वातावरण उघडल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान संबंधित काम कारपेटसह नव्याने करण्यात येणार असल्याची तसेच सदर खराब कामांबाबत अहवालही वरीष्ठ कार्यालयास लवकरच पाठवण्यात येतील अशी माहिती शिरूर उपविभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-१, अनिल जाधव यांनी दिली आहे.
आंबेगाव विभागाच्या कार्यक्षेत्रात येणारा रस्ता आमदाबाद ते मलठण या कामाची ही संबंधित विभागाकडील अधिकारी सुर्यकांत कुंभार यांच्याकडून द पाहणी करण्यात आली असून सदर काम मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेले असून अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष कामाची पाहणी करून वाळुंज यांनी या कामातील निकृष्ट बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या, संबंधित रस्त्यावर सध्या तात्पुरत्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले असुन पावसाळा संपल्यानंतर आमदाबाद येथील गोडबोले वस्तीजवळील रस्ता ते आमदाबाद फाटा चौक,हाॅटेल देवकीनंदन मिसळ समोरील ते मयुरेश्वर माॅलपर्यंत, हाॅटेल विश्वपॅलेस ते मलठण ओढ्यापर्यंत आणी ओढ्यापुढील काम ते मलठण शाळे नजीक रोहित्र(डीपी) पर्यंत. या लांबीतील कामे खराब झाल्याने ही कामे नव्याने दुरूस्ती करून नवीन बीसी(BC) सिलकोटसह करण्यात येतील .असे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अभियंता सूर्यकांत कुंभार यांच्याकडून तक्रारदार वाळुंज यांना सांगण्यात आले आहे.
वाळुंज यांनी सदरचे काम खुप मोठ्या प्रमाणात खराब झाले असल्याने संपूर्ण कामच पुन्हा नव्याने करून देण्याबाबत तसेच पुढील कारवाईस्तव योग्य अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात यावा .निकृष्ट कामे करणारे ठेकेदार काळ्या यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सार्वजनिक बांधकाम, पुणे विभागातील वरीष्ठांनी कार्यालयातून बाहेर येवून अशा कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अशा दर्जाहिन कामांबाबत गांभीर्यपूर्वक लक्ष देणे अपेक्षित आहे, अशी मागणी आंबेगाव सा.बां. विभागाचे अधिकारी सुर्यकांत कुंभार यांच्याकडे करण्यात आली आहे.
सदर कामाबाबत संपूर्ण रस्त्यावर फिरून पाहणी करण्यात आली, यावेळी मळगंगा उद्योग समूहाचे अशोक माशेरे उपस्थित होते .माशेरे यांनी सांगीतले की देखरेखीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी असतानाही रस्त्याचे येवढे निकृष्ट काम होतेच कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कामांचा निकृष्ट दर्जा समोर दिसतच आहे, संबंधित विभाग हे त्यांच्या आश्वासनांची पूर्ती करतील आणी झालेली निकृष्ट कामे नव्याने करून देतील असे अपेक्षित आहे, अन्यथा या निकृष्ट कामांविरोधात जनहितास्तव जनआंदोलन करावे लागेल, कारण निकृष्ट कामे ही या देशाला लागलेली कीड आहे यातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आहे राष्ट्रीय संपत्तीची लूट होत आहे, यामुळेच निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत अशी कामे करून शासनाची व जनतेची फसवणूक करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होण ही पुढील काळात आवश्यक आहेत, दोनही कामांची निःपक्ष चौकशी होऊन संबंधित ठेकेदार हे काळे यादी टाकण्यात यावेत आणि दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणे राष्ट्रहितास्तव आवश्यक आहे, याबाबत आवाज उठवल्यानंतर आमदाबाद ग्रापं ने ही याबाबत पाठिंबा दर्शवला आणी तसे पत्रही मुख्य अभियंता,सा.बां. प्रा.वि.पुणे,यांना दिले आहे याबाबत मी ग्रापं आणि सरपंच सोनालीथोरात यांचे आभार व्यक्त करतो.
निलेश यशवंत वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते





