“राजकारणी लोक खूप वाईट त्यांना….”; गुंड निलेश घायवळच्या आईचा मोठा गौप्यस्फोट, आता प्रकरण वेगळ्या ट्रॅकवर….

Nilesh Ghaywal: विदेशात फरार झालेल्या पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. सोशल मीडियावर राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबतचे निलेश घायवळ याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे निलेश घायवळ याला नेमकं कोण अभय देत आहे? असा प्रश्न विचारल जात आहे. अशातच निलशे घावळ याच्या आईने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत निलेश होता. विरोधकांनी त्याला ठरवून अडकवण्याचा कट रचला असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट निलेश घायवळची आई कुसुम घायवळ यांनी केला आहे. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट गेला. यामुळे गोळीबारीच्या घटनेनंतर आता या प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. आरोप- प्रत्योरापच्या फैरी झडू लागल्या आहेत.
राजकारणी लोक खूप वाईट
गेल्या चार वर्षांपासून आम्ही सगळेच चांगले जीवन जगत होतो. परंतु राजकारणी लोक खूप वाईट आहेत. त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचे नाही. त्यांनी राजकारणात येऊ नये, गुन्हेगारीत राहावे आणि जेलमध्येच जावे, अशी राजकारण्यांची इच्छा होती, असा दावा निलेशच्या आईने केला आहे.
त्याच्याकडून काही लोकांनी गुन्हे करवून घेतले
पुढे त्या म्हणाल्या, माझ्या मुलाला राजकारणात प्रवेश करायचा होता. तो नगर जिल्ह्यातील सोनेगाव जिल्हा परिषदेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता. मात्र, निलेशने राजकारणात येऊ नये म्हणून विरोधकांनी त्याला बाजूला करण्याचे षडयंत्र रचले, असा दावाही निलेशच्या आईने केला. अतिशय चांगले शिक्षण घेऊन साहेब बनण्याचे स्वप्न निलेशचे होते, पण मित्रांच्या नादाने गुन्हेगारी क्षेत्रात गेला. त्याने स्वत:हून कोणतेही गुन्हे केले नाहीत. त्याच्याकडून काही लोकांनी गुन्हे करवून घेतले, असाही खळबळजनक आरोप कुसुम यांनी केला आहे.
हेही वाचा : या’ देशात ७.६ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप ; त्सुनामीचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन





