दसरा मेळाव्यात राजकीय तोफ धडाडणार! उद्धव ठाकरेंचं भाषण वादळी होणार; मेळाव्यात ‘हे’ मुद्दे विशेष गाजणार

Dussehra gathering Ubatha : आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जय्यत तयारी सभास्थळी करण्यात आली आहे. या मेळाव्याला ठाकरेंना माननारे शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आपले भाषण करणार आहेत. त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असून ते नेमकं काय बोलणार याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरून भाजपकडून सातत्याने टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मेळावा रद्द करून त्यांनी होणारा खर्च पुरग्रस्तांना करावा, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच मेळाव्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाबाबतही भाष्य केले होते. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणत्याही स्थितीत मेळावा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे या मेळाव्यातून टीकेची तोफ कोणावर डागणार, नेमकं काय बोलणार? मुद्दे कोणते असणार? याबाबत जाणून घेवूयात…
महत्वाचे मुद्दे
सर्वांत महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मुंबई पालिकेवर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जाणर आहेत. ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे.
- दोन्ही ठाकरे बंधू मेळाव्यात दिसणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. मात्र, दोघेही एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. तसेच या मेळाव्यातून शिवसेना आणि मनसे यांची राजकीय युतीचीही घोषणा केली होऊ शकते असेही सांगितले जात आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काय आवाहन आणि सूचना करणार
- भारत पाकिस्तान सामना यावर भाष्य करण्याची शक्यता
- राज्यातील पूरस्थिती, केंद्राकडून मदतीची अपेक्षा याबाबत नेमकं काय बोलणार
- सध्याच्या राजकीय सामाजिक गोष्टींवरही भाष्य करू शकतात
हा दसरा मेळावा महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नव्याने उत्साह भरतील. दसरा एक प्रकारे महापालिका निवडणुकीचे रणशिंग मेळाव्याच्या निमित्ताने फुंकले जाणार आहे.
हेही वाचा : एलॉन मस्कने मोडले श्रीमंतीचे सर्व विक्रम ; ५०० अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील पहिला व्यक्ती बनले




