PMC Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ (मुकुंदनगर – सॅलसबरी पार्क) मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अक्षय जैन, डॉ. स्नेहल पाडळे, योगिता सुराणा आणि पुष्कर आबनावे यांनी आज मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे भेट देत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या महर्षी नगर भागात अनेक वर्षांनंतर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य पाहायला मिळत आहे. या जनसंपर्क मोहिमेदरम्यान काँग्रेस नेते ॲड. अभय छाजेड यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या, ज्यामुळे या भागात काँग्रेसच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. स्थानिक समस्यांवर चर्चा आणि आश्वासने- भेटीदरम्यान उमेदवारांनी केवळ प्रचार न करता नागरिकांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या. परिसरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि इतर नागरी समस्यांबाबत रहिवाशांनी आपली गाऱ्हाणी मांडली. या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते तातडीने सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन चारही उमेदवारांनी यावेळी दिले. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, नागरिकांचा पाठिंबा- आंबेडकर नगरमधील नागरिकांनी काँग्रेस उमेदवारांचे जंगी स्वागत केले. यावेळी इमाम हनुरे, रुक्मिणी देडे, रावसाहेब खवळे, धनंजय देडे, सुरेश चौधरी, दौला अत्तार, कृष्णी सोनकांबळे, रमेश सोनकांबळे, अकबर मान्यार, अशोक नेटके, नीता नेटके, जाहिर शेख, कांतिलाल क्षीरसागर, सादिक सेख, सुलेमान सुलतान खान, सुरेश सामुकराव, मन्सूर अमीन खान, जाहिदा इस्माईल खान यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. “विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक राजकारणाला आमचा पाठिंबा आहे,” अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या. बालेकिल्ल्यात पुनरागमन? महर्षी नगर आणि आसपासच्या परिसरात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. आजच्या प्रतिसादावरून या प्रभागात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. लोकाभिमुख राजकारणामुळे जनमत काँग्रेसच्या बाजूने वळत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.