नागपूर – हरित इंधनामुळे पाच वर्षांनंतर देशातील वाहनांमध्ये पेट्रोलचा वापर करण्याची गरज संपुष्टात येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केल्यानंतर अकोल्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि इतर हरित इंधनाचा वापर वाढवण्यावर आपल्या भाषणात जोर दिला. ते म्हणाले की, ग्रीन पेट्रोलचा वापर वाढला तर मी पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की पाच वर्षांनी पेट्रोल देशातून नाहीसे होईल.
‘या’ पेयांच्या सेवनाने बेली फॅट घटेल अगदी सहज !
तुमच्या कार आणि स्कूटर एकतर ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी किंवा एलएनजीवर असतील. येत्या पाच वर्षांत कृषी विकास 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर नेण्यासाठी कृषी संशोधक आणि तज्ज्ञांनी काम करावे, असे आवाहनही गडकरींनी केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची गरजही गडकरी यांनी व्यक्त केली.