नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. उत्तर प्रदेशच्या पक्षनेतृत्वाला निवडणूक लढविण्यापासून आणि त्याच वेळी पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा इशारा दिला होता. आधी पक्षाची पुनर्बांधणी करा, नंतर निवडणूक लढवण्याबद्दल विचार करा, अशी सूचना केली होती. अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली आहे. ते एका वृत्तवाहीच्या मुलाखती मध्ये बोलत होते.
पी चिदंबरम म्हणाले की, “मी उत्तर प्रदेशच्या पक्ष नेतृत्वाला एकाच वेळी निवडणूक लढविण्यापासून आणि पक्षाची पुनर्बांधणी करण्यापासून सावध केले होते. आधी पक्षाची पुनर्बांधणी करा, नंतर निवडणूक लढवण्याबद्दल विचार करा, अशी सूचना त्यावेळी केली होती.
प्रियंका गांधी यांच्यावर चार वर्षांपूर्वी त्यांचे भाऊ आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी सोपवली होती. परंतु निवडणूक प्रचारादरम्यान या दोन्ही गोष्टी करण्याबाबत त्या उघडपणे बोलत होत्या,” असे भाष्य आज चिदंबरम यांनी केले आहे. या निवडणुकीत झालेल्या पराभवाला केवळ गांधी कुटुंबाला जबाबदार धरणं योग्य नाही, यावेळी असेही ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात काँग्रेसचा पराभव होत आहे. हे असे राज्य आहे की 1989 पासून राज्य केले नाही. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा अक्षरश: सफाया झाला. 2017 मध्ये जिंकलेल्या सातपैकी पाच जागा गमावल्या. पक्षाची मते 2.4 टक्क्यांवर आली.पक्षात काही गंभीर कमतरता आहेत, ज्या मी, कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणल्या आहेत. या पाच राज्यांत झालेल्या पराभवानंतर सर्वात आधी आम्हाला त्या संघटनात्मक कमकुवतपणा दूर करावा लागेल.