Sanjay Raut : “पापा वॅार रुकावा सकते है लेकिन…”; भारत-पाकिस्तान सामन्यावर संजय राऊतांचा शाब्दिक हल्ला

Sanjay Raut : आज दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्याला कडाकडून विरोध होताना दिसत आहे. हा सामना रद्द करण्याची मागणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने तर या सामन्याविरोधात “माझं कुंकू, माझा देश” असं म्हणत आंदोलन केलं जाणार आहे.
अशातच या सामन्यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप के पापा वॉर रुकवा सकते है, मगर मॅच नही रोक सकते है. ट्रम्प के दबाव मै, हिंदुस्तान पाकिस्तान का वॉर भी रोक सकते है, अशा शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. हा नक्की असा कोणता पैशाचा खेळ आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही
मोदी-शाहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्या 26 लोकांच्या बायकांच्या कपाळावरचा सिंदूर पुसला गेला. मोदींनी छाती पिटण्याचा कार्यक्रम केला. भारताने याआधी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेतली आहे. पण जय शहा यांचा त्यात इन्ट्रेस्ट आहे. मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही, असा आरोपही राऊतांनी केला आहे.
दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग?
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवत आजच्या मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग झालं असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. भारतीय क्रिकेट संघाला हा सामना खेळायचा नाही. त्यांच्यावर जय शाहांचा दबाव आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी सामना खेळू नये, असंही म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने बाहेर पडावे आणि राष्ट्रभक्ती दाखवावी, असंही राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा : ‘विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, ठाकरे आणि शरद पवार गटाला एकही जागा…”; गिरीश महाजनांचे विधान





