Pankaj Bhoyar : गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात हुंडा संबंधित गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, अशी माहीती मंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी दिली आहे. तसेच, राज्य सरकारने दक्षता समित्या आणि विशेष चौकशी पथकांच्या माध्यमातून या प्रथेविरुद्ध कारवाई तीव्र केली असल्याचे त्यांनी नमूद केले. विधानसभेत उपस्थित केलेल्या एका लक्षवेधी प्रस्तावाला उत्तर ते उत्तर देत होते. भोयर म्हणाले, हुंडासंबंधित गुन्हे २०२२ मध्ये १८० होते, ते २०२५ मध्ये १३८ पर्यंत कमी झाले आहेत आणि यामध्ये ३१३ जणांना अटक करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास विभागाने अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र हुंडा प्रतिबंधक नियम २००३ द्वारे राज्याने हुंडा विरोधी कायदा लागू केला आहे. Pankaj Bhoyar अशा प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांची नियुक्ती, महिला आणि मुलांवरील गुन्हे रोखण्यासाठी अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पोलिसांमध्ये स्वतंत्र शाखा स्थापन करणे यासह सरकारने उपाययोजना केलेल्या आहेत. Pankaj Bhoyar Pankaj Bhoyar हुंडा आणि घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महिलांसाठी हेल्पलाइन, भरोसा सेल, दक्षता समित्या आणि विशेष पोलिस तपास पथके यासारख्या यंत्रणा स्थापन करण्यात आल्या आहेत, असे भोयर म्हणाले. चर्चेदरम्यान, अनेक आमदारांनी हुंडा प्रकरणात न्यायाला होणाऱ्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली. काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांनी कायदेशीर तरतुदी असूनही हुंडा प्रकरणी झालेल्या मृत्यूबद्दल जिल्हावार डेटा मागितला. त्यांनी अशा प्रकरणांमध्ये पोलिस तपासाचा कालावधी आणि प्रक्रिया जलद करण्यासाठी उचललेली पावले याबद्दल देखील विचारले.