बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी भारताच्या नावाने शिमगा केला. दरम्यान, पीसीबीचे ( PCB ) प्रमुख रमीझ राजा यांनी याबाबत आता मोठं वक्तव्य केलं आहे. जर टीम इंडिया आशिया चषकासाठी आपल्या देशात खेळायला आली नाही, तर पाकिस्तानी संघही पुढच्या वर्षी भारतात वर्ल्ड कप खेळायला जाणार नाही, असं रमीझ राजा यांनी म्हटलं आहे.
“या दोन खेळाडूंमुळे शिखर धवनला इज्जत मिळत नाही” रवी शास्त्रीचं वक्तव्य!
पाकिस्तानी चॅनल उर्दू न्यूजशी बोलताना रमीझ राजा हे म्हणाले की, “जर भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही, तर आम्ही विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही. आमच्या बाजूनेही आक्रमक भूमिका घेतली जाईल. विश्वचषकात पाकिस्तान खेळला नाही तर कोण बघणार? आमची भूमिकाही आम्ही विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही अशीच आहे.”
“या दोन खेळाडूंमुळे शिखर धवनला इज्जत मिळत नाही” रवी शास्त्रीचं वक्तव्य!
महत्त्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते की, भारतीय संघ पुढील वर्षी आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. त्यानंतर पीसीबी ( PCB )कडून प्रतिक्रिया येण्यास सुरु झाल्या. त्यानंतर पीसीबीने आशियाई क्रिकेट परिषदेची तातडीची बैठक बोलावण्याची विनंतीही केली होती.
पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघाला भारत सरकारच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारत सरकारने नकार दिल्यास टीम इंडिया तिथे खेळण्यास जाणार नाही. भारतात पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांमुळे मागील बऱ्याच काळापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संबंध बिघडलेले आहेत. क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाही, असे भारत सरकारने आगोदरच म्हटले आहे.