Olympic Games 2036 : – खेळ लोकांना प्रेरणा देतात आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताने २०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन केले पाहिजे. यातून खेळातील गुणवत्तेला प्रेरणा मिळू शकेल, असे मत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले. आयओसीचे विद्यमान अध्यक्ष थॉमस बाक यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत आयओसी काँग्रेसमध्ये भारताच्या बोलीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या मागणीला ठाम पठिंबा दर्शविला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करताना मोठ्या प्रमाणावर जागतिक स्पर्धा आयोजित करण्याची भारताची क्षमता असल्याचे प्रतिपादन करून, २०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करणे हे भारताचे स्वप्न आहे, आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत, असे म्हटले होते. Asian Champions Trophy 2024 : भारतीय हॉकी संघाची घोषणा, ‘हे’ 18 खेळाडू चीनमध्ये दाखवतील आपली ताकद… २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी बोली लावण्यासाठी भारताने अहमदाबादला खेळांचे यजमानपद भुषविण्यासाठी निश्चित करुन जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. १८ व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर खा. मनसुख मांडविया यांची क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने, शहरातील क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळाली आहे.