Naming of Islampur city : महाराष्ट्रातील काही शहरांचे नामंतर करण्यात आल्याने ती शहरे आता नव्या नाव्याने ओळखू लागली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामकरण झाले असून, ही शहरे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या नाव्याने ओळखली जात आहेत. नुकतेच सांगली जिल्ह्यात असलेल्या इस्लामपूर शहराच्या नामंतराला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती. आता केंद्रानेही इस्लामपूर शहराच्या नामकरणास हिरवा कंदील दर्शवत मान्यता दिली आहे. आता इस्लामपूर हे शहर ईश्वरपूर या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याच्या प्रस्तावाला अखेर मान्यता दिली आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली. यामध्ये इस्लामपूर शहराचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. राज्य सरकारकडून नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावर केंद्राने देखील मंजुरी दिली असून, यामुळे नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. इस्लामपूर शहर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे. हेही वाचा : “माझ्यावर चार वेळा…”; हातावर पेनाने सुसाईड नोट लिहित महिला डॅाक्टराने संपवले जीवन, साताऱ्यातील फलटणमध्ये नेमकं काय घडलं?