Maharashtra Navnirman Sena : दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीचं बिगुल केव्हाही वाजू शकतं. या निवडणुका तीन टप्प्यांत होणार असल्याची माहिती समोर आली असून, निवडणुकीच्या संभाव्य तारखाही समोर आलेल्या आहेत. या सगळ्यात दुसरीकडे राजकीय पक्ष निवडणुकीच्या रंणांगणात उतरण्यासाठीची पूर्वतयारी करण्यात व्यस्त आहेत. निवडणुकीच्या अंनुषंगाने इन्कमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसे आणि उद्धवसेना यांची राजकीय युती होणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. थोडक्यात मनसेने जर शिवसेनेशी युती केली तर आघाडीत येण्याचा पर्याय मनसेला खुला असणार का? यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी साफ नकार देत नव्या भिडूची गरज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता मनसेचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या मित्रपक्षाची गरज नाही, असं सपकाळ म्हणाले आहेत. महाविकास आघाडीला नवीन भिडूची आवश्यकता नाही, असं म्हणत सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनाकरिता तसेच भाजपच्या दंडेलशाहीविरोधात लोकशाही वाचवण्यासाठी आणि मोदींना हटवण्यासाठी महाविकास आघाडी गठीत झाली आहे, असं त्यांनी सागितलं. या भूमिकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कोणाकडे हात पसरला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आघाडीमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील अशी स्पष्ट भूमिका अभ्यंकर यांनी दिली. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पाचव्यांदा झालेल्या भेटीवर बोलताना अभ्यंकर म्हणाले राजसाहेब आणि उद्धवजी यांच्यातील भेट अराजकीय आणि कौटुंबिक आहेत. हेही वाचा : शेअर बाजार तेजीत ; सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारला, निफ्टी २५१६० च्या पुढे