रोहटक – आपल्याकडे लोक जय श्रीराम म्हणतात आणि जय सीयारामही म्हणतात. अगोदर राहुल गांधी विदेशी आहे की भारतीय आहेत ते समजले पाहिजे अशा शब्दांत हरियाणातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनीही राहुल यांच्यावर टीका केली आहे.
गृहमंत्री असलेले वीज म्हणाले की अगोदर राम हे काल्पनीक असल्याचे ते म्हणाले होते. त्यांनी रामसेतुही काल्पनीक असल्याचे म्हटले होते. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी लोकांच्या मनातून प्रभू श्रीरामांना काढण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, भाजपकडून राहुल यांच्या चौफेर टीका सुरू झाल्यावर आता कॉंग्रेसनेही त्याला उत्तर दिले आहे. भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या यशामुळे भाजप हताश झाला असून अशा निराधार गोष्टी शोधून ते टीका करत असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे.