छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांना केले ठार
Updated On:

छत्तीसगढ- महाराष्ट्रानंतर आता नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ मधील सामान्य ग्रामस्थांवर हल्ला केला आहे. बुधवारी रात्री सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम भागात नक्षलवाद्यांनी हल्ला केला असून, यामध्ये दोन गावकऱ्यांना ठार मारले आहे. घटनेची माहिती मिळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सध्या पुढील तपास सुरु आहे. महाराष्ट्रात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर छत्तीसगढमध्ये देखील सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला होता. जांभूळखेडा गावाजवळील ही घटना आहे. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ मध्ये हल्ला घडून आणला.




