Vijay Wadettiwar : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ व्हायरल प्रकरणामुळे मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. अशातच या प्रकरणावर राजकीय वातावरण देखील तापले आहे. भाजप नेत्यांकडून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणातील पीडित तरुणी हिंदू असल्याचा दावा केला होता. यानंतर आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणांवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी विषवल्ली आहे, अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मांमध्ये भांडण लावून समतेची पोळी कशी चाखता येईल हे पाहणे. महिलांवरील शोषण अत्याचारांमध्ये जात, धर्म, पंथ येतो कुठे? असा सवाल विचारत जो कुणी असेल तो नालायकच असतो त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले. लोकांनी पाडलं लोकांनी जिरवली तरी तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाहीत. ज्यांना हनुमान चालीशीच्या दोन ओळी म्हणता येत नाहीत, ते हिंदू धर्मांच्या गोष्टी करायला लागल्यात, असाही बोचरा वार वडेट्टीवार यांनी केला आहे. या टीकेला आता नवनीत राणा काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. बावनकुळे यांचे आवाहन परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरण अत्यंत गंभीर आहे, असं म्हणत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकप्रतिनिधींना अशा प्रकरणात संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा तसंच अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी माध्यमांसमोर विनाकारण वक्तव्य करून सामाजिक वातावरण बिघडवू नये, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. महिलांच्या आरक्षणासंदर्भात बनवाबनवी : वडेट्टीवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासीयांना संबोधित केले. लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर मोदींनी देशवासीयांसोबत संवाद साधला. यावर भाष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच भाषण हे पूर्णत: पंतप्रधानांचे भाषण नव्हतं, तर राष्ट्रीय नेत्याचे होते, अशी टीका केली. जवळपास पन्नास वेळा त्यांनी काँग्रेसच नाव घेतलं. एवढी भीती का वाटते काँग्रेसची? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. मनुस्पृती जपणारी भाजप आता महिलांच्या आरक्षणासंदर्भात बनवाबनवी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हेही वाचा : Akshay Kumar : ॲक्शन हिरोचा रिअल लाइफ थरार… खिलाडी कुमार मृत्यूच्या दाढेतून तीनदा बचावला! स्वत: केला खुलासा