नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सगळ्यांत ज्येष्ठ न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. त्यानंतर आपण बोलून नाही, तर काम करून दाखवू. सर्वसामान्य जनतेसाठी काम करू. ही मोठी संधी आहे व मोठी जबाबदारीही आहे. सामान्य नागरिकांची सेवा करण्याला माझे प्राधान्य असेल. न्यायालयीन सुधारणा, तांत्रिक सुधारणा, रजिस्ट्रेशनच्या संदर्भात सुधारणा यात सामान्य माणसाला प्राधान्य असल्याचे दिसून येईल, असे त्यांनी शपथ घेतल्यानंतर म्हटले आहे.
भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांना राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात शपथ दिली. pic.twitter.com/aah8UJ9Q0V
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 9, 2022
राष्ट्रपती भवन येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चंद्रचूड यांना भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. चंद्रचूड यांचे वडीलही भारताचे सरन्यायाधीश होते. या पदावर त्यांनी सात वर्षे चार महिने काम केले होते. जो सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या सरन्यायाधीशांनी इतके काळ काम करण्याचा विक्रम आहे.
22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 या काळात ते सरन्यायाधीश होते. आता न्या. डी. वाय. चंद्रचूड यांची नियुक्ती 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे दोन वर्षांसाठी असणार आहे.
ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार करणार – मुख्यमंत्री शिंदे
संयम सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य
न्या. चंद्रचूड यांच्या बाबतीत सांगितले जाते की, सुनावणीच्या काळात ते अत्यंत संयम बाळगू असतात. काही दिवसांपूर्वीच सलग दहा तास सुनावणी घेण्याचा पराक्रम त्यांनी करून दाखवला होता. काम हेच आपली पूजा असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्याहून विशेष म्हणजे त्यांचे वडील न्या. यशवंत चंद्रचूड यांनी दोन प्रकरणांत केलेला निवाडाही डी. वाय. चंद्रचूड यांनी बदलला होता. अनेक ऐतिहासिक खटल्यांची नोंद त्यांच्या नावावर असून ती यादी फारच मोठी आहे.