Mohan Bhagwat on Tariff। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील टॅरिफयुद्ध सुरू केले असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी,”स्वदेशी वस्तूंचेअवलंब करणे आणि स्वावलंबन हाच एकमेव मार्ग आहे” असे म्हणत स्वदेशीचा मंत्र यावेळी उपस्थितांना दिला. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून विजयादशमीच्या भाषणात, मोहन भागवत बोलत होते. यावेळी त्यांनी, “परस्पर जोडलेल्या जगात, व्यापारी भागीदारांवर भारताचे अवलंबित्व असहाय्य होऊ नये आणि देशाने स्वदेशी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.” असे म्हटले. तसेच पुढे मोहन भागवत बोलताना, “आपल्या देशात तरुण उद्योजकांमध्ये आर्थिक प्रगती करण्यासाठी उत्साह जाणवत आहे. अमेरिकेने त्यांच्या फायद्यासाठी शुल्क धोरणे स्वीकारली असतील. जगाचे जीवन अवलंबित्वावर चालते. एकच राष्ट्र एकाकी राहू शकत नाही. हे अवलंबित्व सक्ती बनू नये. आपण स्वदेशी आणि स्वावलंबन स्वीकारले पाहिजे. याला पर्याय नाही.”असेही सांगितले. ‘आपल्या शेजारील देशात…’ Mohan Bhagwat on Tariff। भागवत यांनी यावेळी,“ट्रम्पच्या शुल्कांचा परिणाम आपल्या सर्वांवर होतो. अवलंबित्व सक्ती बनू नये म्हणून आपण स्वदेशी उत्पादनांचा वापर केला पाहिजे. आपले शेजारी देश अशांततेचा सामना करत आहेत. तेथील अस्थिरता आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे.”असे त्यांनी म्हटले. मोहन भागवत पुढे म्हणाले की, “सुदैवाने, भारतात आशा आहे कारण आपली तरुण पिढी देशभक्तीकडे अधिकाधिक आकर्षित होत आहे. अमेरिकेतील जीवन प्रगत मानले जाते आणि जर आपण असे जगलो तर आपल्याला पाच पृथ्वींची आवश्यकता असेल. जग पैसे आणि कामाच्या मागे धावत आहे.” मोहन भागवत पुढे म्हणाले, “माणूस हा व्यवस्थेचा निर्माता आहे. व्यवस्था समाजाप्रमाणेच कार्य करतील. समाजाच्या वर्तनात बदल घडले पाहिजेत. समाजाने स्वतःला नवीन वर्तनाशी जुळवून घेतले पाहिजे, ही बदलाची पूर्वअट आहे. आपण त्या बदलाचे उदाहरण म्हणून जगले पाहिजे.” ‘तुम्हाला हवा असलेला देश…’ Mohan Bhagwat on Tariff। मोहन भागवत म्हणाले की, “संघाने अनुभवले आहे की वैयक्तिक बदलामुळे सामाजिक बदल होतो आणि सामाजिक बदलामुळे व्यवस्था बदल होतो. तरच जगात बदल घडू शकतो. सवयी बदलल्याशिवाय बदल घडू शकत नाही. तुम्हाला हवा असलेला देश बनावे लागेल. संघाच्या शाखा सवयी बदलण्यासाठी एक व्यवस्था आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की,”संघाला राजकारणात प्रवेश करण्याचे आमिष दाखवून आमंत्रित केले गेले होते, परंतु त्यांनी नकार दिला. स्वयंसेवक गेल्या ५० वर्षांपासून शाखेत येत आहेत आणि ते अजूनही येत आहेत. कारण सवय मोडू नये. ती व्यक्तिमत्व आणि देशभक्ती निर्माण करते. यासाठी देशात एकता आवश्यक आहे.”