Sanjay Raut : “लालकिल्ल्यावर मोदींचं शेवटचं भाषण होतं, पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल” : संजय राऊतांचं स्फोटक वक्तव्य
Sanjay Raut : आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना हा दावा केला.

Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेची तोफ डागताना दिसत आहेत. आता त्यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
“लालकिल्ल्यावर मोदींचं शेवटचं भाषण होतं. पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल. हे मी सर्व जागतिक स्तरावर जे चित्र आहे, त्यानुषंगाने बोलत आहे.” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पंतप्रधान हे त्यांची टर्म पूर्ण करत नाही. त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावं लागेल. तुम्हाला १७ सप्टेंबर नंतर उलगडा होईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना हा दावा केला.
लालकिल्ल्यावर मोदींचं शेवटचं भाषण होतं. पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल : संजय राऊत
“१७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस आहे. त्यामुळे अंधभक्तांनी उड्या माराव्यात, पार्ट्या कराव्यात. अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत. मोदी पायउतार झाल्यावर आहे काय? एकावर एक फ्रि आहे. माझ्याकडे जी काही माहिती आहे किंवा राहुल गांधी जे सांगतात. आमच्यासमोर जे काही तथ्य येतात, त्यानुसार मी सांगत आहे. लालकिल्ल्यावर मोदींचं शेवटचं भाषण होतं. पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल. हे मी सर्व जागतिक स्तरावर जे चित्र आहे.”
पंतप्रधान हे त्यांची टर्म पूर्ण करत नाही. त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावं लागेल : संजय राऊत
“येत्या एक वर्षाच्या आत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावं लागेल, असे राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटले आहे, यावर बोलताना ते म्हणाले “मी गेले काही दिवस काय सांगतो? पंतप्रधान हे त्यांची टर्म पूर्ण करत नाही. त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावं लागेल. तुम्हाला १७ सप्टेंबर नंतर उलगडा होईल.”
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यांमुळे याचे तीव्र पडसाद भाजपमध्ये उमटल्याची शक्यता आहे. या दाव्यांवर भाजप नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. यावेळी अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात संजय राऊत यांनी मोठा इशारा दिला. चोरांनी चोरायला सोडायचं हे चाललं आहे. चंपत राय आणि अनिल मिश्रा सर्वत्रच आहेत. महाराष्ट्रातही आहेत. त्यांना सोडलं असलं तरी आमचं आंदोलन संपणार नाही.






