मुंबई : भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात अनिल परब यांना उद्देशून केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मेहबूब शेखसारख्यांना 1760 तंगड्याला बांधून फिरते, असे म्हणाल्या होत्या. आता हा आकडा कमी सांगितला आहे, तसेच चांगल्या घरातील महिला कमरेखालची भाषा बोलू शकते का? अशी विचारणा देखील मेहबूब शेख यांनी केली आहे. लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचे तेच मेहबुब शेख म्हणाले की, काही लोकांच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते. तसेच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचे तेच आहे. माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला होता. मेहबूब शेख सारखे 1760 तंगड्याला बांधून फिरते असे म्हणाल्या होत्या. आता अनिल परब आहेत. चांगल्या घरातील महिला कमरेखालची भाषा बोलू शकते का? अशी विचारणा मेहबूब शेख यांनी केली आहे. ऐकायला तरी चांगले वाटेल का? भाजपला लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईला आमदार करायला लागले, तर दुर्दैव आहे. अशा लोकाना आमदार केल्यास तर सभागृहाचे पावित्र्य राहणार नाही, आता आणि बढतीसाठी प्रयत्न करतील, अशी टीका मेहबूब शेख यांनी केली. चित्रा वाघ यांचे वक्तव्य काय? ज्याची जशी लायकी, तसाच विचार तो करतो. सुषमा अंधारे यांनी जे बोलल्या, त्यात त्यांची चूक नाही, त्यांची तेवढीच लायकीच आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. १७५६ आणि तुमच्यासारखे ५६ नीच पुरुषांना मी रोज पायाला बांधून फिरते. मी जे बोलले, त्याचा मला अभिमान आहे, असे त्या पुढे म्हणाल्या. आज ठेचले, पुन्हा नादी लागलात तर पुन्हा ठेचेन, असा इशारा त्यांनी अनिल परब यांना दिला. सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्याच्या विचारलेल्या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, तुमचा नवरा तुमच्याच मुलाची डीएनए टेस्ट का मागतो? हे उत्तर द्या. नाव न घेता त्यांनी अंधारेंना हे आव्हान दिले. सुषमा यांनी माझ्या चारित्र्यावर शेरेबाजी केली. विरोधकांचे जुने नेते थकले, आता हे नवे सुरू झाले. पण माझ्या चारित्र्यावर एकच प्रश्न किती वर्ष विचारणार? असे सांगत त्यांनी विरोधकांना कोंडीत पकडले. विधान परिषदेत अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्यानंतर हा वाद पेटला होता. यावर वाघ म्हणाल्या, परब यांनी माझ्यावर बोट दाखवले, म्हणून मी उत्तर दिले. हा फक्त माझा प्रश्न नाही, तर महिलांवर दादागिरी आणि अपमानाचा आहे. महिलांचा आवाज दाबण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही स्वतःला काय समजता? तुमची लायकी काय? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. आम्हाला हलक्यात घेऊ नका, हा संदेश देण्यासाठीच मी बोलले, असेही त्या म्हणाल्या.