Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे यांचे विरोधी पक्षांना ऐक्याचे आवाहन; मोदी सरकारच्या कारभारावर कडाडून टीका
परीक्षांमधील गोंधळामुळे देशातील लाखो तरुणांच्या आशा-आकांक्षांचा विश्वासघात केला जात आहे आणि भाजपशासित राज्यांमध्ये समाजातील दुर्बल घटकांवर होणारे अत्याचार थांबलेले नाहीत

Mallikarjun Kharge – मोदी सरकारच्या गैरकारभारामुळे देशासमोर निर्माण झालेली राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्र धोरणांची आव्हाने पेलण्यासाठी विरोधी पक्षांनी आपले ऐक्य अधिक मजबूत करावे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी केले. नवी दिल्लीत आयोजित इंडिया आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते.
खर्गे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, देशात संविधानावरील हल्ले अद्यापही सुरूच आहेत. राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. तसेच, बिगर-भाजप सरकारांसोबत सातत्याने दुजाभाव केला जात आहे.
देशातील आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, सध्याचे आर्थिक वातावरण अत्यंत नकारात्मक आहे. नवीन रोजगारांची निर्मिती होण्यासाठी ज्या गतीने गुंतवणूक येणे आवश्यक आहे, त्या गतीने ती येत नाहीये. काही मोजक्याच क्षेत्रांमध्ये खाजगी मक्तेदारी वाढत असून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग गंभीर संकटात सापडले आहेत.

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे यांचे विरोधी पक्षांना ऐक्याचे आवाहन; मोदी सरकारच्या कारभारावर कडाडून टीका
देशातील परीक्षा पद्धतीच्या ढिसाळ व्यवस्थापनावर बोट ठेवत खर्गे यांनी संताप व्यक्त केला. परीक्षांमधील गोंधळामुळे देशातील लाखो तरुणांच्या आशा-आकांक्षांचा विश्वासघात केला जात आहे आणि भाजपशासित राज्यांमध्ये समाजातील दुर्बल घटकांवर होणारे अत्याचार थांबलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. (Mallikarjun Kharge)
विरोधी पक्षांच्या एकजुटीचे महत्त्व पटवून देताना खर्गे म्हणाले, १७ एप्रिल २०२६ रोजी लोकसभेत आपण सर्वांनी मिळून अत्यंत निर्णायकपणे आपली एकता दाखवून दिली होती. मोदी सरकारच्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबतच्या वादग्रस्त विधेयकांचा आपण एकत्रितपणे पराभव केला होता. आता आपल्याला तोच ऐक्याचा मार्ग अधिक मजबूत करायचा आहे.
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्रचना प्रक्रियेमुळे लाखो लोकांचे मतदानाचा हक्क हिरावून घेतले जात आते. भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे कमकुवत झाले असून, भारताच्या पारंपरिक मूल्यांचे रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचे खर्गे म्हणाले. (Mallikarjun Kharge)




