Building Collapse : मोठी दुर्घटना..! 5 मजली इमारत पत्यासारखी कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली
Building Collapse : राजधानी दिल्लीतील अतिशय महत्त्वाच्या चाणक्यपुरी परिसराजवळील सत्य निकेतन भागात रविवारी ५ मजली इमारत अचानक पत्त्यांसारखी कोसळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Building Collapse : राजधानी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील सत्य निकेतन भागात रविवारी पाच मजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या इमारतीत विद्यार्थ्यांचे हॉस्टेल असल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेनंतर 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Building Collapse)
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांचा आणि इतर नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. (Building Collapse)
ढिगाऱ्याखाली 50 हून अधिक विद्यार्थी?
इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, 50 पेक्षा अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अडकलेल्या व्यक्तींची नेमकी संख्या आणि त्यांच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांचीही मोठी गर्दी झाली असून, बचाव पथकांकडून ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. (Building Collapse)
NSUI कडून सरकारवर निशाणा
या दुर्घटनेनंतर काँग्रेसशी संबंधित विद्यार्थी संघटना NSUI ने सरकारवर संताप व्यक्त केला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या साउथ कॅम्पसजवळील सत्य निकेतन परिसरात इमारत कोसळल्याची घटना अत्यंत चिंताजनक असल्याचे NSUI ने म्हटले आहे. (Building Collapse)
ढिगाऱ्याखाली दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी दबले असल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा करत, प्रशासन आणि सरकारने तातडीने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबवावे, अशी मागणी NSUI ने केली आहे. (Building Collapse)
‘निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही’
प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिकाला सुरक्षितपणे बाहेर काढावे. तसेच या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही NSUI ने केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे. (Building Collapse)
‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?’
NSUI ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मोठ्या व्यासपीठांवर जातात; मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यावर सरकार त्यांना विसरते, असा आरोप NSUI ने केला आहे. (Building Collapse)
केंद्रात भाजपचे सरकार, दिल्लीत भाजपचे सरकार आणि MCD मध्ये भाजपचा महापौर असल्याचा उल्लेख करत ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?’ असा सवाल NSUI ने उपस्थित केला आहे. (Building Collapse)
दरम्यान, या दुर्घटनेतील अडकलेल्या व्यक्तींची नेमकी संख्या, जखमींची माहिती आणि इमारत कोसळण्यामागील कारण स्पष्ट होणे बाकी आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. (Building Collapse)
Moshi building collapse : वायसीएमबाहेर आक्रोश… अश्रूंनी भरला परिसर!






