सातारा सिंचन विभागात मोठा फेरबदल; अभय काटकर सातारचे अधीक्षक अभियंता, अरुण नाईक यांची मुख्य अभियंतापदी बढती
Updated On:

कोयनानगर: दि. १३ जून रोजी राज्य शासनाने जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या व नवीन नेमणुका जाहीर केल्या आहेत. या बदल्यांच्या आदेशात सातारा सिंचन विभागात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. सातारा सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांची पदोन्नती होऊन त्यांची मुख्य अभियंता पदावर बदली झाली आहे.
त्यांच्या जागी आता अभय गोविंद काटकर यांची अधीक्षक अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काटकर यापूर्वी पुणे येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते.





