मुंबई : 2019 च्या विधानसभेपासून 2024 च्या विधानसभेपर्यंत पाहिलं तर मागील पाच वर्षात 32 लाख मतदारांची संख्या वाढली आहे. पण विधानसभा निवडणूक होईपर्यंतच्या पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत 76 लाख मतदारांची संख्या वाढली आहे. जवळपास 50 लाख अतिरिक्त मतदार वाढले आहेत. यातील बहुतेक मतदान महायुतीच्या बाजूने झाले आहे. कारण लोकसभेमधील मतदानाचे आकडे पाहिले तर महायुतीला जवळजवळ 76 लाख मतं अतिरिक्त पडली आहेत. तसेच 32 लाख मतं महायुतीच्या बाजूने वळविल्याने त्यांचा विजय झाला, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र पत्रकार परिषद पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. आमचा प्रमुख आक्षेप आहे की, नवीन मतदारांची नोंदणी करताना घराचा सर्व्हे करावा लागतो, पण तसे काही केलेले नाही. लोणीमध्ये एका पत्यावर जवळपास 5 हजार मतांची नोंदणी झाली आहे. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केली आहे, परंतु पुढे काहीच झाले नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज मतदान दिन आहे. एका अर्थाने आज निवडणूक आयोगाचा वाढदिवस आहे. पण महाराष्ट्राची जनता कधी निवडणूक आयोगाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेली आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल अनेक मुद्दे आहेत, त्यामध्ये निवडणूक यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, मतदार यादी, निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशाचा वापर, सत्तेचा वापर असे अनेक विषय आहेत. हे विषय वेगवेगळ्या पातळीवर काँग्रेस पक्ष मांडणार आहे. पण आज मतदार यांद्याबद्दल मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या जवळजवळ 100 पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. हा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाचा संयुक्त निर्णय होता. सर्व उमेदवारांनी याचिका दाखल करावी. काही जणांना याचिका दाखल करता आली नाही. माझ्या स्वत:च्या याचिकेवर काल पहिली सुनावणी झाली. सहा आठवड्यानंतर सुनावणीची दुसरी तारीख पडेल. त्यामध्ये अनेक विषय घेतले जातील, पण आजचा विषय प्रविण चक्रवर्ती यांनी फक्त मतदार याद्यांमधील वाढीव मतदारांचा घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत जो काही पाच ते सहा महिन्याचा कालावधी होता, त्या कालावधीमध्ये 76 लाख मतदार वाढले आहेत, असा आरोपी चव्हाण यांनी केला.