Maharashtra Cabinet : राज्य सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेल्या निर्णयात महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय झाला. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी अमरावती महानगरपालिकेला १६,७०८ चौरस मीटर जागा वाटप करण्याचा अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे. Maharashtra Cabinet यापासून सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार आहे. तसेच, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे. अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील १६७०८ चौ.मी.जागेसाठी मंजूरी देण्यात आली आहे. भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद असणार आहे. हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार आहे. यामुळे राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन, तसेच अर्जांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार आहे. Maharashtra Cabinet दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा Maharashtra Cabinet महत्वाच्या निर्णयात, राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळाने बुधवारी १२ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर इयत्ता ८ वी ते १२ वी मधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यास मंजुरी दिली. या वाढीमुळे शिष्यवृत्तीची रक्कम १००-२०० रुपयांवरून ५००-१,००० रुपयांच्या श्रेणीत जाणार आहे. याचा लाभ ९२,५८१ विद्यार्थ्यांना मिळेल. या वाढीसाठी २३.११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. Maharashtra Cabinet