Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लागली लॉटरी; सरकारने मान्य केली ‘ती’ मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत (Ladki Bahin Yojana) एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत (Ladki Bahin Yojana) एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी (Ladki Bahin Yojana) प्रक्रियेवरून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि तांत्रिक कारणांमुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नव्हता. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत महिलांना मोठा दिलासा दिला आहे.
आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी (Ladki Bahin Yojana) पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने सहा महिन्यांची मुदत दिली आहे. ही राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या मुदतवाढीमुळे ज्या महिलांचे ई-केवायसी रखडले होते, त्यांना आता पुरेशी संधी मिळणार आहे.
तसेच, ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे, परंतु त्यात काही त्रुटी किंवा उनिवा राहून गेल्या आहेत, त्यांना त्या चुका सुधारण्याची विशेष संधी देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी अत्यंत यशस्वीरित्या केली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हप्ता वाढवण्याबाबत मुख्यमंत्री घेतील निर्णय
काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढवावा, अशी मागणी काही महिलांकडून करण्यात आली होती. या मागणीवर भाष्य करताना आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवायचा का आणि किती वाढवायचा, यासंदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील.
दिल्लीतील आंदोलने आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया
दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकल्यास ती शासनाच्या निदर्शनास आणून देणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या हे सरकार अतिशय सकारात्मक पद्धतीने सोडवेल आणि आपली शिक्षण व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.






